
पुणे – केंद्र सरकारच्या ‘सहकारी बँकिंग कायद्या’तील दुरुस्तीमुळे सहकारी बँकिंग क्षेत्रावर विपरित परिणाम होणार असल्याचा दावा करत राज्यातील ‘नागरी सहकारी बँक असोसिएशन’ने उच्च न्यायालयात जाण्याचा निर्णय घेतला आहे. ‘बँकिंग रेग्युलेशन ॲक्ट’मधील दुरुस्तीच्या अनुषंगाने १५ जून या दिवशी साखर संकुल येथे ‘ऑनलाईन’ चर्चासत्र आयोजित करण्यात आले होते. ‘सहकारी बँका उद्योग-व्यवसायांसाठी कर्जपुरवठा करतात; मात्र या कायद्यातील दुरुस्तीमुळे बँकांना कामकाजात अडचणी येतील’, असे सहकारमंत्री बाळासाहेब पाटील यांनी सांगितले. ‘सहकार हा विषय राज्याच्या अखत्यारित येत असतांना त्यातील नोंदणी, नियंत्रण आणि अवसायन यांसंदर्भात केंद्र सरकारने कायदा करून राज्याच्या अधिकारावर अतिक्रमण केले आहे’, असे सहकारी बँकेचे प्रशासक विद्याधर अनास्कर यांनी सांगितले. या चर्चासत्रात राज्यातील ४०० बँका सहभागी झाल्या होत्या.
‘श्री मोरया गोसावी मंदिर’ परिसरातील विक्रेत्यांवर कायमस्वरूपी कारवाई करावी !
पुणे येथील ‘टाटा कन्सल्टन्सी सर्व्हिसेस’मधील वरिष्ठांच्या त्रासाला कंटाळून अभियंत्याची आत्महत्या !
झाडांच्या संवर्धनात निष्काळजीपणा केल्यास भावी पिढीसाठी पुष्कळ रुग्णालये बांधावी लागतील !
सांगलीसह राज्यातील १२ बाजार समित्यांना ‘राष्ट्रीय बाजारपेठे’चा दर्जा !
शहरी आणि ग्रामीण भागांतील युवकांचे प्रश्न सोडवले जातील ! – अभिजित दीपके, कॉकरोच जनता पक्ष
वीजदेयकांविषयीचा प्रश्न सुटेपर्यंत स्मार्टमीटर बसवणे स्थगित ! – मुख्यमंत्री प्रमोद सावंत