किमान समान कार्यक्रमाच्या आधारे महाविकास आघाडी सरकार ५ वर्षे टिकेल ! – नवाब मलिक, अल्पसंख्यांक विकासमंत्री

मुंबई – स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका या स्थानिक राजकीय परिस्थितीनुसार लढवल्या जातात. त्यामुळे काही ठिकाणी या निवडणुका महाविकास आघाडी म्हणून लढण्याचा किंवा काही ठिकाणी स्वतंत्रपणे लढवण्याचा निर्णय परिस्थितीनुसार घेण्यास सरकारमधील प्रत्येक पक्ष मोकळा आहे. किमान समान कार्यक्रमाच्या आधारे महाविकास आघाडी सरकार ५ वर्षे टिकेल, असा विश्‍वास अल्पसंख्यांक विकासमंत्री नवाब मलिक यांनी व्यक्त केला. काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष नाना पटोले यांनी स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका स्वबळावर लढवण्याची पक्षाची सिद्धता असल्याचे वक्तव्य केले. यावर मलिक यांनी वरील प्रतिक्रिया दिली.