असे निवेदन का द्यावे लागते ? प्रशासन स्वतःहून जनतेच्या आरोग्याच्या दृष्टीने आवश्यक असणार्या कृती लगेच का करत नाही ? परिस्थिती हाताबाहेर जाण्यापूर्वी उपाययोजना काढल्यास सर्वांचा वेळ वाचेल.

उंचगाव (जिल्हा कोल्हापूर), ९ जून – उंचगावमध्ये कोरोना समवेत चिकनगुनिया आणि डेंग्यूसदृश आजारानेही मोठ्या प्रमाणात डोके वर काढले आहे. प्रियदर्शनी कॉलनी, मंगेश्वर कॉलनी, रेडेकर गल्ली यांसह संपूर्ण गावात साथ पसरली आहे. तरी उंचगाव येथे डेंग्यूसह चिकनगुनिया सदृष्य आजार मोठ्या प्रमाणात पसरत असल्याने तातडीने उपाययोजना करावी, या मागणीचे निवेदन करवीर शिवसेनेचे तालुकाप्रमुख श्री. राजू यादव यांनी आरोग्याधिकारी डॉ. जी.डी. नलवडे यांना दिले. या वेळी सर्वश्री दीपक पाटील, संतोष चौगुले, दीपक रेडकर, बाळासाहेब नलवडे यांसह अन्य उपस्थित होते.
भगवान श्रीकृष्णाचा अवमान करणार्या मौलाना जर्जिस अन्सारीच्या प्रतिमेस जोडेमारा आंदोलन
प्रशासन व्यवस्थाकेंद्रित हवे !
Stray Dogs Attack : भटक्या कुत्र्याच्या आक्रमणात घायाळ झालेल्या मुलीला १ लाख रुपयांची हानीभरपाई देण्याचा आदेश
Allahabad HC : बुलडोझर कारवाईसंदर्भात अलाहाबाद उच्च न्यायालयाच्या खंडपिठातील न्यायाधिशांचा परस्परविरोधी निकाल !
CJP Protest : ‘न्यायालयाला यात ओढू नका’, असे सांगत तातडीने सुनावणी करण्यास न्यायालयाचा नकार
स्मार्ट वीजमीटरला विरोध करणार्यांचा आवाज दाबण्याचा प्रयत्न ! – सिंधुदुर्ग वीज ग्राहक संघटना, दोडामार्ग शाखा