चंद्रपूर – जिल्ह्यातील सिंदेवाही तालुक्यातील पवनपार गावालगतच्या अरण्यात ६ एप्रिल या दिवशी सकाळी मोहफूल वेचण्यासाठी कमलाकर उंदीरवाडे आणि धुर्वास उंदिरवाडे गेले होते. त्या वेळी वाघाने आक्रमण करून त्यांना ठार केले. एकाच वेळी वाघाने २ लोकांना ठार केल्याची ही घटना अतिशय दुर्मिळ आहे. यामुळे परिसरात मोठी दहशत पसरली आहे. जिल्ह्यात गेल्या २ मासांत वाघांच्या आक्रमणांत ९ लोकांचा मृत्यू झाला आहे. जिल्ह्यात गेल्या वर्षी जवळपास ३० लोकांचा वाघांच्या आक्रमणांत मृत्यू झाला होता. वाघांच्या आक्रमणांतील मृत्यूची ही आतापर्यंतची सर्वांत मोठी संख्या आहे. २ मासांत वाघांच्या आक्रमणांत ९ जणांचे बळी गेल्याने परिसरात भीतीचे वातावरण पसरले आहे.
सनातन प्रभात > Location > आशिया > भारत > महाराष्ट्र > चंद्रपूर जिल्ह्यात गेल्या २ मासांत वाघांच्या आक्रमणांत ९ लोकांचा मृत्यू !
चंद्रपूर जिल्ह्यात गेल्या २ मासांत वाघांच्या आक्रमणांत ९ लोकांचा मृत्यू !
नूतन लेख
- समुद्रकिनार्यांवरील भटक्या कुत्र्यांची समस्या गंभीर, सरकारच्या हस्तक्षेपाची मागणी
- उष्णतेमुळे गोव्यातील ७ धरणांतील पाण्याच्या पातळीत घट
- पुणे येथील ठाकरे गट युवासेनेमधील अनेक पदाधिकार्यांनी आदित्य ठाकरेंकडे दिले त्यागपत्र !
- होर्डिंग उभारण्यासाठी महापालिकेच्या समोरील झाडाच्या फांद्या तोडल्या !
- ‘आर्.टी.ई.’ अंतर्गत प्रवेशासाठी पुन्हा नव्याने ऑनलाईन अर्ज सादर करावेत ! – योगेश कडूसकर, उपायुक्त
- संशयित गणेश मिस्कीन आणि अमित बद्दी यांच्या विरोधात कोणताही ठोस पुरावा नसल्याने त्यांना जामीन संमत करावा ! – अधिवक्ता समीर पटवर्धन