चंद्रपूर जिल्ह्यात गेल्या २ मासांत वाघांच्या आक्रमणांत ९ लोकांचा मृत्यू !

चंद्रपूर – जिल्ह्यातील सिंदेवाही तालुक्यातील पवनपार गावालगतच्या अरण्यात ६ एप्रिल या दिवशी सकाळी मोहफूल वेचण्यासाठी कमलाकर उंदीरवाडे आणि धुर्वास उंदिरवाडे गेले होते. त्या वेळी वाघाने आक्रमण करून त्यांना ठार केले. एकाच वेळी वाघाने २ लोकांना ठार केल्याची ही घटना अतिशय दुर्मिळ आहे. यामुळे परिसरात मोठी दहशत पसरली आहे. जिल्ह्यात गेल्या २ मासांत वाघांच्या आक्रमणांत ९ लोकांचा मृत्यू झाला आहे. जिल्ह्यात गेल्या वर्षी जवळपास ३० लोकांचा वाघांच्या आक्रमणांत मृत्यू झाला होता. वाघांच्या आक्रमणांतील मृत्यूची ही आतापर्यंतची सर्वांत मोठी संख्या आहे. २ मासांत वाघांच्या आक्रमणांत ९ जणांचे बळी गेल्याने परिसरात भीतीचे वातावरण पसरले आहे.