राज्यात २८ मार्चपासून रात्रीची जमावबंदी घोषित ! – मुुख्यमंत्री

मुंबई – कोरोनाचा संसर्ग वाढत असल्याने येत्या रविवारपासून म्हणजे २८ मार्चपासून रात्रीची जमावबंदी घोषित करण्याचा निर्णय मुुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी घेतला आहे. यासंदर्भातील सूचना त्यांनी दिल्या आहेत, तसेच ‘यासंबंधीचे स्वतंत्र आदेश मदत आणि पुनर्वसन विभागाकडून निर्गमित व्हावेत’, असे सांगितले.

सोलापूर – सोलापुरात शनिवार-रविवार दुकाने बंद ठेवण्याचा निर्णय घेण्यात आला असून इतर दिवशी सकाळी ७ ते सायंकाळी ७ पर्यंत व्यवसाय करण्यास अनुमती आहे. रात्री ११ ते पहाटे ५ पर्यंच संचारबंदी लागू असणार आहे. सोलापूर शहर आणि ग्रामीण भागात कोरोना रुग्णांची संख्या वाढत असल्याने हे निर्णय घेण्यात आले.