शिर्डी येथे श्री साईदर्शनासाठी नवीन नियमावली, सकाळी ६ ते रात्री ९ वाजेपर्यंतच दर्शन

पहाटेची काकड आरती आणि रात्रीच्या शेजारतीला भक्तांना उपस्थित रहाता येणार नाही. गुरुवार आणि सलग सुट्टीच्या दिवशी भक्तांना ‘ऑनलाईन’ पास बंधनकारक आहे, तर २५ फेब्रुवारी या दिवशी होणारा श्री साईपालखी सोहळा रहित करण्यात आला आहे.

शिवरायांची ‘जगदंबा’ तलवार परत न करणार्‍या इंग्लंडच्या क्रिकेट संघाला महाराष्ट्रात खेळू देणार नाही !

छत्रपती शिवाजी महाराजांची ‘जगदंबा’ तलवार भारताला परत न देणार्‍या इंग्लंडच्या क्रिकेट संघाला महाराष्ट्राच्या भूमीवर क्रिकेट खेळू देणार नाही.

कामाच्या वेळी २ सत्रांत, तसेच ‘वर्क फ्रॉम होम’ करण्याचे मुख्यमंत्र्यांचे निर्देश

मंत्रालयातील अधिकारी आणि कर्मचारी यांना कोरोनाचा वाढता संसर्ग लक्षात घेऊन मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी मंत्रालयात ‘वर्क फ्रॉम होम’, तसेच २ सत्रांत कामाच्या वेळा निश्‍चित करण्याचे निर्देश राज्याचे मुख्य सचिव संजय कुमार यांना दिले आहेत.

कोरोना नियम मोडल्यामुळे राष्ट्रवादीचे खासदार डॉ. अमोल कोल्हे यांची ट्विटरद्वारे महापौरांवर कारवाई करण्याची मागणी

कोरोनाचे रुग्ण वाढत असतांना पिंपरी-चिंचवड भाजपच्या महापौर उषा ढोरे यांनी भाजप आमदार लक्ष्मण जगताप यांच्या वाढदिवसानिमित्त २२ फेब्रुवारी या दिवशी चिंचवड येथे ‘फॅशन शो’ आयोजित करत नागरिकांचा जीव धोक्यात घातला.

वर्ष २०२० मध्ये रेल्वे तिकिटांमध्ये काळाबाजार करणार्‍या ४६६ दलालांवर गुन्हे नोंद

एवढ्या मोठ्या प्रमाणात चालू असलेला काळाबाजार हे रेल्वे यंत्रणेतील बोकाळलेल्या भ्रष्टाचाराचे लक्षण आहे. या प्रकरणी कारवाई करतांना काळाबाजार रोखण्यासाठीही केंद्रशासन आणि रेल्वे प्रशासन यांनी ठोस भूमिका घ्यावी.

७ मार्चपर्यंत सोलापुरात रात्री ११ ते पहाटे ५ पर्यंत संचारबंदी

कोरोनाचा वाढता संसर्ग लक्षात घेऊन सोलापूर शहर आणि जिल्हा या ठिकाणी २४ फेब्रुवारीपासून रात्री ११ ते पहाटे ५ वाजेपर्यंत संचारबंदी घोषित करण्यात आली आहे. ही संचारबंदी ७ मार्चपर्यंत असणार आहे.

यवतमाळ जिल्ह्यातील नागरिकांनी कोरोना चाचण्यांसाठी समोर यावे, अन्यथा संचारबंदी लागू करू ! – संजय राठोड, पालकमंत्री

जिल्ह्यात कोरोनाबाधितांच्या संख्येत वाढ होत असल्याने नागरिकांनी कोविडच्या संदर्भातील सूचनांचे काटेकोरपणे पालन करावे आणि कोरोनाची लक्षणे असणार्‍यांनी चाचण्यांसाठी समोर यावे, अन्यथा प्रशासनाला जिल्ह्यात संचारबंदी करण्याविना पर्याय नाही

कोरोनाच्या पार्श्‍वभूमीवर महाराष्ट्रात घडणार्‍या ठळक घडामोडी

कोरोनाच्या पार्श्‍वभूमीवर राज्य सरकारच्या सूचनेप्रमाणे श्री तुळजाभवानी मंदिर संस्थानच्या वतीने १० सहस्र भाविकांना प्रवेश ‘पास’ देण्यात येत आहेत. यापूर्वी ३० सहस्र भाविकांना दर्शन घेता येत होते.

हरिद्वार कुंभमेळ्याची मानक संचालन प्रक्रिया रहित करण्यासाठी धरणे आंदोलन

कुंभच्या मानक संचालन प्रक्रियेच्या (एस्.ओ.पी.च्या) विरोधात व्यापार्‍यांनी सुभाषघाटावर अनिश्‍चितकालीन धरणे प्रारंभ केले आहे. व्यापार्‍यांनी कोरोना चाचणीचा अहवाल आणि नोंदणी अनिवार्य केल्याने त्यांनी कुंभनगरीमध्ये जाण्यास नकार दिला आहे.

नरेंद्र मोदी यांनीच अब्दुल कलाम यांना राष्ट्रपती केले ! – चंद्रकांत पाटील, भाजप

पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि भारतीय जनता पक्ष मुसलमान विरोधी नसून नरेंद्र मोदी यांनीच भारतरत्न डॉ. अब्दुल कलाम यांना राष्ट्र्रपती केले, असे विधान भाजपचे प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील यांनी केले.