
मुंबई – सचिन वाझे याला पुन्हा पोलीस सेवेत घेण्यास माझा विरोध होता. त्यासाठी मी शरद पवार, संजय राऊत आणि अनिल देशमुख यांना सांगितले होते; पण माझे ऐकले गेले नाही. सरकारने ही मोठी चूक केली, असे वक्तव्य समाजवादी पक्षाचे आमदार अबू आझमी यांनी एका वृत्तवाहिनीला दिलेल्या मुलाखतीमध्ये केले.
या वेळी अबू आझमी म्हणाले, ‘‘विधीमंडळात विरोध पक्षाच्या नेत्यांनी मागणी केल्यानंतर वाझे याला निलंबित करायला हवे होते. त्या माणसाचे चारित्र्य पहिल्यापासून खराब आहे. गृहमंत्र्यांवर आरोप करणार्या परमबीर सिंह यांच्यावरच पहिली कारवाई व्हायला हवी. गृहमंत्री वसुली करायला सांगत होते, तर त्याची कल्पना शरद पवार आणि मुख्यमंत्री यांना आधीच का दिली नाही ? खरेतर परमबीर सिंह हे स्वत:च पूर्वीपासून वसुलीचे काम करतात. त्यांच्या विरोधात त्याविषयीच्या अनेक तक्रारी आहेत.’’
ढवळी परिसरात बिबट्याचे आक्रमण
मळेवाड येथे बिबट्याच्या आक्रमणात वासराचा मृत्यू
गोव्यातील ५६ गावांच्या शहरीकरणाच्या अधिसूचनेला विरोध
अत्याचार केल्याप्रकरणी धर्मांधाला सश्रम कारावास आणि दंड !
आषाढी वारीसाठी आरोग्य यंत्रणा सज्ज
पक्षातील एकही खासदार फुटणार नसल्याचा शरद पवार यांना विश्वास !