पोलीस ठाण्याच्या हद्दीत हुक्का पार्लर आणि डान्स बार आढळल्यास पोलीस अधिकार्‍यांना उत्तरदायी धरणार ! – अनिल देशमुख, गृहमंत्री

हुक्का पार्लर प्रकरणी शिवसेनेने तारांकित प्रश्‍नोत्तराच्या वेळी ‘या प्रकरणी किती ठिकाणी कारवाई करण्यात आली ?’ असा प्रश्‍न उपस्थित केला होता.

प्रेमाच्या खोट्या जाळ्यात (हनीट्रॅपद्वारे) अडकवून फसवणूक करणारी टोळी पोलिसांच्या कह्यात

व्हॉट्सअ‍ॅप, फेसबूक आदी सामाजिक संकेतस्थळांद्वारे ओळख निर्माण करत प्रेमाच्या खोट्या जाळ्यात ओढून नागरिकांना लुटणार्‍या तिघांना सातारा तालुका गुन्हे प्रकटीकरण शाखेच्या पथकाने कह्यात घेतले आहे.

बेंगळुरू-अहमदाबाद एक्सप्रेसमध्ये दरोडा

मध्य रेल्वेच्या सोलापूर विभागातून धावणारी बेंगळुरू-अहमदाबाद एक्सप्रेस रेल्वे गाडीत १ मार्चला पहाटे दरोडा पडला. या दरोड्यात चोरट्यांनी प्रवाशांना मारहाण करून त्यांचे ५० तोळ्यांचे दागिने लुटले आहेत.

यवतमाळ येथे केंद्रीय कोरोना नियंत्रण पथकाची भेट !

जिल्ह्यात कोरोनाच्या रुग्णांच्या संख्येत प्रतिदिन वाढ होत आहे. त्याची कारणे जाणून घेऊन त्यावर प्रतिबंधात्मक उपाययोजना प्रभावीपणे राबवण्यासाठी केंद्रीय कोरोना पथकाचे डॉ. आशिष रंजन यांनी १ मार्च या दिवशी शहराला भेट दिली.

वणी-कायर रेल्वे मार्गावर कोळसा भरलेले १२ डबे रूळावरून घसरले

कोळसा खाणीतील कोळसा १ मार्च २०२१ या दिवशी रेल्वेने नांदेडकडे नेण्यात येत होता. बाबापूर फाट्याजवळ कोळसा भरलेले १२ डबे रूळावरून घसरले.

हिंदु जनजागृती समिती आणि सनातन संस्था राष्ट्रजागृतीचे उत्तम कार्य करत आहेत ! – शिवाजीराव मोहिते, संपादक, ‘सी’ न्यूज

हिंदु जनजागृती समिती आणि सनातन संस्था राष्ट्रजागृतीचे उत्तम कार्य करत आहेत. त्यामुळे त्यांच्या उपक्रमांना प्रसिद्धी देण्यात आमचाही वाटा आहे, याचा आम्हाला आनंदच आहे, असे मत ‘सी’ न्यूजचे संपादक श्री. शिवाजीराव मोहिते यांनी व्यक्त केले.

प्रत्येक हिंदूने स्वरक्षणाचे ध्येय ठेवले पाहिजे ! – हर्षद खानविलकर, हिंदु जनजागृती समिती

अभियंता किंवा आधुनिक वैद्य किंवा पदवीधर होऊन विदेशात पैसा कमावणे असे ध्येय ठेवण्यापेक्षा आता स्वरक्षणाचे ध्येय ठेवले पाहिजे, अशी अत्यावश्यकता निर्माण झाली आहे.

विद्यार्थ्यांमध्ये वाचन संस्कृती रुजवा !  – प्रकाश नाईक, माहिती अधिकारी, गोवा

राष्ट्रीय एकता बळकट करण्यासाठी आणि आपली कला अन् संस्कृती आणि मातृभाषेचे संवर्धन अन् समृद्धी साधण्यासाठी मुलांमध्ये बाल्यावस्थेपासूनच एकता आणि राष्ट्रप्रेम यांची ज्योत जागवणे आवश्यक असल्याचे श्री. प्रकाश नाईक यांनी सांगितले.

सीमावाढ भागाच्या विकास आराखड्यासाठी लवकरच निधी मिळणार ! – उदयनराजे भोसले

नगरविकास मंत्री एकनाथ शिंदे यांना सातारा नगरपालिकेने सीमावाढ भागाचा ५१ कोटी रुपयांचा विकास आराखडा सादर केला आहे. याविषयी मंत्रीमहोदयांसमवेत सकारात्मक चर्चा झाली आहे.

बेलवंडी (जिल्हा नगर) येथील पोलीस ठाण्यातील ६ पोलीस कोरोनाबाधित

कोरोना प्रतिबंधक लस घेतल्यानंतरही नगर येथील श्रीगोंदा तालुक्यातील बेलवंडी पोलीस ठाण्यातील ६ पोलिसांना कोरोनाची बाधा झाली आहे. हे पोलीस सध्या घरीच विलगीकरणात आहेत