गुरुपौर्णिमेला २४ दिवस शिल्लक
गुरु शिष्याचे भोग टाळीत नाहीत; पण भोग भोगत असतांना ते त्याचे समाधान टिकवतात !
गुरु शिष्याचे भोग टाळीत नाहीत; पण भोग भोगत असतांना ते त्याचे समाधान टिकवतात !
गुरु आपल्या डोळ्यांतून, शब्दांतून किंवा स्पर्शाने कृपेचा ओघ बुद्धीपुरस्सर भक्ताकडे लावतात. ही कृपा शिष्याला गुरूंच्या प्रयत्नाने दिलेली असते.
श्रीगुरूंच्या अनुग्रह शक्तीलाच गुरुपद म्हणतात. ते उपेय आहे, म्हणजेच उपायांच्या सहयोगाने त्याची प्राप्ती होते; परंतु श्रीगुरु हेच प्रत्यक्ष उपाय आहेत !
दुसर्यांवरील अवलंबित्व कमी केल्याने टप्प्याटप्प्याने मायेतून सुटत जाण्यास साहाय्य होणे
सहजध्यान चालू करण्याकरता गुरूंची आवश्यकता भासते; कारण केवळ त्यांचीच अंतःस्थिती उच्च कोटीची असते. गुरूंमुळे चालू झालेले हे सहजध्यानच शेवटी योग्याला पूर्णत्व प्राप्त करून देऊ शकते.
एक बद्ध जीव दुसर्या बद्ध जीवाचा उद्धार करू शकत नाही. गुरु मुक्त असल्यानेच शिष्यांचा उद्धार करू शकतात !
गुरु ज्याच्यावर कृपा करतात, त्याचे तन, मन, धन, सुख, दु:ख, अहं इत्यादी सर्व हरण करतात.
वेद, शास्त्र, स्मृती इत्यादींच्या बहुवाक्यतेचे एकवाक्यीकरण गुरुकृपेने होते. बाह्यतः त्यांचे शब्दार्थ निराळे वाटले, तरी भावार्थ एकच कसा, हे गुरुकृपेने कळते.
गुरूंना अंतर्ज्ञानाने सर्वकाही समजते, या अनुभूतीमुळे शिष्य वाईट कृत्ये करणे बर्याचदा टाळतो !