
नवी देहली – ‘नीट’ (नॅशनल एलिजिबिलिटी कम एन्ट्रन्स टेस्ट, म्हणजेच राष्ट्रीय पात्रता आणि प्रवेश परीक्षा) प्रश्नपत्रिका फुटीच्या प्रकरणात जे लोक सहभागी होते, त्यांपैकी १३ लोकांना अटक करण्यात आली आहे. जे याला उत्तरदायी आहेत, त्यांच्यावर सर्वांत कठोर कारवाई केली गेली पाहिजे, जेणेकरून भविष्यात कुणीही असे करण्याचे धाडस करणार नाही, असे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी पावसाळी अधिवेशनाच्या पार्श्वभूमीवर भाजपप्रणीत राष्ट्रीय लोकशाही आघाडीच्या संसदीय दलाच्या बैठकीत म्हटल्याची माहिती सूत्रांनी दिली.
पंतप्रधान मोदी बैठीकत पुढे असेही म्हणाले की, उत्तरदायी लोकांना पकडल्यानंतर सरकारने पुन्हा परीक्षा घेतली आहे. प्रश्नपत्रिका फुटीचे प्रकरण भयंकर पाप आहे. अशा घटना भविष्यात घडू नयेत, यासाठी सर्व राज्यांनी एकत्रित मिळून काम करायला हवे. विद्यार्थ्यांच्या भविष्याशी संबंधित कोणताही विषय हलक्यात घेता येणार नाही. राज्य सरकारांनी परीक्षा पद्धत सुरक्षित करायला हवी. अशा घटना घडू नयेत; म्हणून परीक्षा पद्धत अधिक बळकट करावी लागेल.
महाराष्ट्र लोक आयुक्त कार्यालयात १४३ पदांच्या सुधारित आकृतीबंधाला मान्यता !
‘वन्दे मातरम्’ गीताचा धगधगता इतिहास आता नाशिकमध्ये !
Sewri Mumbai Muslims Attack : क्षुल्लक कारणावरून मुसलमानांकडून हिंदूंना भीषण मारहाण
Delhi Congress Protest : पंतप्रधान मोदी यांच्या निवासस्थानाबाहेर काँग्रेसचे आंदोलन
यंदाचा ‘लोकमान्य टिळक राष्ट्रीय पुरस्कार’ राष्ट्रीय सुरक्षा सल्लागार अजित डोवाल यांना घोषित !
Farmers’ March Postponed : पंजाबच्या शेतकर्यांचा देहलीमध्ये काढण्यात येणारा मोर्चा पुढे ढकलला