
‘काही आध्यात्मिक संस्था किंवा संप्रदाय यांनी कोणतेही उपक्रम राबवले वा कार्यक्रम केले की, ‘आम्ही हे केले, आम्ही ते केले’, असे सांगतांना दिसतात; मात्र सनातनमध्ये सर्व कार्य महर्षि, संत आदींच्या, म्हणजे देवाच्या मार्गदर्शनानुसार केले जाते. त्यामुळे दैनिक ‘सनातन प्रभात’मध्ये ‘…..यांनी सांगितल्याप्रमाणे केले’, असा उल्लेख असतो. कर्तेपणा स्वतःकडे न घेण्यासाठी असे नसते, तर ती वस्तूस्थिती असते. याचाच दुसरा पैलू म्हणजे स्वतःचा मोठेपणा दाखवण्याची धडपड नसल्यामुळे ‘स्वतः काही केले नाही’, याचा न्यूनगंडही वाटत नाही, उलट आज्ञापालन केल्याचा आनंदच वाटतो. सनातन संस्थेने राबवलेल्या एखाद्या उपक्रमाचा उल्लेख काही बातम्यांत केला जातो. तेही केवळ अशा उपक्रमांच्या माध्यमांतूनही साधना करता येऊ शकते, हे समाजासमोर उदाहरण ठेवण्याचे एक माध्यम असते.’
– (परात्पर गुरु) डॉ. आठवले
यात काय आश्चर्य !
सच्चिदानंद परब्रह्म डॉ. आठवले यांनी साधकांना सत्संगात केलेले अनमोल मार्गदर्शन !
संतश्रेष्ठ ज्ञानेश्वर महाराज यांनी वर्णिलेले सद्गुरुमाहात्म्य आणि त्यातून श्रीसत्शक्ति (सौ.) बिंदा सिंगबाळ यांनी उलगडलेले सच्चिदानंद परब्रह्म डॉ. आठवले यांचे अवतारत्व !
सुख आणि दुःख यांत आनंदाची धार प्रवाहित करणे, हे सद्गुरूंचे मर्म असणे
प्रत्येक साधकाला प्रेमाने बांधून ठेवणारे आणि त्यांच्यावर निरपेक्ष प्रीतीचा वर्षाव करणारे एकमेवाद्वितीय सच्चिदानंद परब्रह्म परात्पर गुरु डॉ. आठवले !
साधकांनो, येणार्या आपत्काळाला सामोरे जाण्यासाठी श्रद्धेच्या बळावर साधनेतील अडथळ्यांवर मात करा !