
‘काही आध्यात्मिक संस्था किंवा संप्रदाय यांनी कोणतेही उपक्रम राबवले वा कार्यक्रम केले की, ‘आम्ही हे केले, आम्ही ते केले’, असे सांगतांना दिसतात; मात्र सनातनमध्ये सर्व कार्य महर्षि, संत आदींच्या, म्हणजे देवाच्या मार्गदर्शनानुसार केले जाते. त्यामुळे दैनिक ‘सनातन प्रभात’मध्ये ‘…..यांनी सांगितल्याप्रमाणे केले’, असा उल्लेख असतो. कर्तेपणा स्वतःकडे न घेण्यासाठी असे नसते, तर ती वस्तूस्थिती असते. याचाच दुसरा पैलू म्हणजे स्वतःचा मोठेपणा दाखवण्याची धडपड नसल्यामुळे ‘स्वतः काही केले नाही’, याचा न्यूनगंडही वाटत नाही, उलट आज्ञापालन केल्याचा आनंदच वाटतो. सनातन संस्थेने राबवलेल्या एखाद्या उपक्रमाचा उल्लेख काही बातम्यांत केला जातो. तेही केवळ अशा उपक्रमांच्या माध्यमांतूनही साधना करता येऊ शकते, हे समाजासमोर उदाहरण ठेवण्याचे एक माध्यम असते.’
– (परात्पर गुरु) डॉ. आठवले
भारतियांचे ईश्वरप्राप्तीच्या प्रयत्नांचे अलौकिकत्व !
बंगालमधील परिवर्तनातून हिंदु राष्ट्राच्या संकल्पनेची प्रचीती !
महर्षि अध्यात्म विश्वविद्यालयाच्या वतीने मंगळुरू (कर्नाटक) येथे भावपूर्ण वातावरणात झालेले ‘ईश्वरप्राप्तीसाठी संगीत-साधना शिबिर’ !
व्यक्तीच्या उजव्या आणि डाव्या हातांच्या अन् पायांच्या बोटांच्या रंगात भिन्नता असण्याचे कारण
सद्गुरु सत्यवान कदम यांची सुश्री मधुरा भोसले यांनी सूक्ष्म ज्ञानातून सांगितलेली गुणवैशिष्ट्ये आणि सद्गुरु सत्यवान कदम यांच्या गुणवैशिष्ट्यांच्या संदर्भात पू. शिवाजी वटकर यांना जाणवलेली सूत्रे !
देवाचे ‘देवपण’ अनुभवण्यासाठी साधना करा !