प्रत्येक कीटक पिकांची हानी करत नाही !
कीटक दिसल्यावर प्रत्येक वेळी ‘त्यांना घालवण्यासाठी काय फवारावे ?’, असा विचार करू नये. काही कीटक हे ‘मित्र कीटक’ असतात. ‘जीवो जीवस्य जीवनम् ।’ म्हणजे ‘एक जीव दुसर्या जिवाचे जीवन आहे’, या न्यायाने ‘निसर्गात प्रत्येक जिवाला काहीतरी कार्य सोपवलेले आहे’, हे लक्षात घ्यायला हवे.’