प्रत्‍येक कीटक पिकांची हानी करत नाही !

कीटक दिसल्‍यावर प्रत्‍येक वेळी ‘त्‍यांना घालवण्‍यासाठी काय फवारावे ?’, असा विचार करू नये. काही कीटक हे ‘मित्र कीटक’ असतात. ‘जीवो जीवस्‍य जीवनम् ।’ म्‍हणजे ‘एक जीव दुसर्‍या जिवाचे जीवन आहे’, या न्‍यायाने ‘निसर्गात प्रत्‍येक जिवाला काहीतरी कार्य सोपवलेले आहे’, हे लक्षात घ्‍यायला हवे.’

गोमूत्र जुने असले, तरी चालते !

गोमूत्र कितीही जुने असले, तरी चालते. त्‍यामुळे आपल्‍या लागवडीच्‍या क्षेत्रानुसार गोमूत्राचा साठा करून ठेवल्‍यास वारंवार गोमूत्र आणण्‍याची आवश्‍यकता रहात नाही.

वेलवर्गीय भाज्‍यांच्‍या बिया कशा लावाव्‍यात ?

वेलवर्गीय भाज्‍यांच्‍या बिया मातीत थेट न पेरता आधी माती घातलेल्‍या कागदी कपांत प्रत्‍येकी १ बी लावून रोपे सिद्ध करावीत. रोपे सिद्ध झाल्‍यावर त्‍यांची वाफ्‍यांत किंवा मोठ्या कुंड्यांत लागवड करावी. हे अधिक सोपे आणि सोयीचे होते.

घरी स्‍वतः पिकवलेला भाजीपाला म्‍हणजे औषधच !

खरेतर ‘आहार हेच औषध’, असे म्‍हणणे सध्‍या कठीणच वाटते; परंतु आपल्‍या घरच्‍या लागवडीत पिकवलेला विषमुक्‍त भाजीपाला मात्र निश्‍चितपणे औषधाचे काम करू शकतो. आजपासूनच आपल्‍या नित्‍य आहारातील न्‍यूनतम काही गोष्‍टी तरी स्‍वतःच पिकवण्‍यासाठी कृतीशील होऊया.

जीवामृत बनवतांना ही सूत्रे लक्षात ठेवावीत

‘जीवामृत सिद्ध करण्‍याची कृती आपण याआधीच्‍या लेखांतून समजून घेतलेली आहे. आता त्‍यासंबंधी अन्‍य सूत्रे जाणून घेऊ.

द्विदल पिके कोणती ?

द्विदल पिकांमुळे भूमीमध्‍ये नत्राचा (नायट्रोजनचा) पुरवठा होतो. आपल्‍याकडील जागेच्‍या उपलब्‍धतेनुसार आपण एकदल पिकांसोबत पुढील द्विदल पिकांची लागवड करू शकतो.

छतावर फळझाडेही लावता येतात

‘अन्य भाजीपाल्याप्रमाणे विटांच्या वाफ्यात किंवा मोठ्या ड्रममध्ये लिंबू, पेरू, सीताफळ, डाळिंब, चिकू, आंबा इत्यादी फळझाडांची कलमे सहज लावता येतात. काळजी नियमित घेतल्यास साधारण एक ते दीड वर्षात या झाडांना फळधारणा होऊ लागते.

थंडीच्‍या दिवसांत सकाळी लवकर झाडांना पाणी देणे टाळावे !

‘थंडीच्‍या दिवसांत पहाटे दव पडून माती आणि पानेही ओली झालेली असतात. या दिवसांत सकाळी लवकर झाडांना पाणी दिले, तर थंड पाण्‍याने मातीतील गारवा आणखीनच वाढतो आणि या अतिरिक्‍त थंडी अन् ओलावा यांमुळे झाडांना अपाय होऊ शकतो.

अतिरिक्‍त ओला कचरा उन्‍हात वाळवून ठेवावा !

अधिकचा ओला कचरा (उदा. मटारची साले, कोथिंबीर, तसेच अन्‍य पालेभाज्‍यांचे देठ) उन्‍हामध्‍ये वाळवून ठेवावा. सुकल्‍यानंतर याचे आकारमान अल्‍प होते आणि आपल्‍याला आवश्‍यकता असेल त्‍यानुसार कुंड्या भरतांना किंवा आच्‍छादनासाठी (भूमी झाकण्‍यासाठी) याचा उपयोग करता येतो.’

जानेवारी-फेब्रुवारी मासांत कोणत्‍या भाज्‍या लावाव्‍यात ?

 ‘जानेवारी-फेब्रुवारी या मासांत उन्‍हाळी भाज्‍यांच्‍या लागवडीचा आरंभ करतात. यांत काकडीवर्गीय सर्व भाज्‍या, उदा. दुधी, कोहळा, भोपळा, दोडके लावता येतात, तसेच वांगी, मिरची, टोमॅटो, भेंडी आणि गवार या भाज्‍या आणि पुदीना, मेथी, पालक, चवळई इत्‍यादी पालेभाज्‍याही लावता येतात.’