अग्नीअस्त्र

‘अग्नीअस्त्र’ हे सुभाष पाळेकर कृषी तंत्रातील एक नैसर्गिक कीटक नियंत्रक आहे. पिकांवरील रसशोषक किडी, पाने, शेंगा खाणार्‍या अळ्या यांवर नियंत्रणासाठी अग्नीअस्त्राची फवारणी करतात. हे घरच्या घरी सिद्ध करता येते.

लागवडीला साहाय्यक ठरणारे ओल्या कचर्‍याचे व्यवस्थापन

जीवामृताचा नियमित उपयोग केला, तर या कचर्‍याचे वेगाने विघटन होते अन् कोणतीही दुर्गंधी किंवा माश्या, चिलटे यांच्या उपद्रवाची समस्या निर्माण होत नाही. हा कचरा लागवडीत पसरतांना शक्यतो पालापाचोळ्याच्या आच्छादनावर पसरावा.

वृक्ष हे जणू सत्पुरुषच !

‘वृक्षाः सत्पुरुषा इव ।’ म्हणजे ‘वृक्ष हे जणू सत्पुरुषच आहेत’, असे एक संस्कृत वचन आहे. सज्जनांच्या सहवासात आपल्याला आनंद मिळतो. नवीन गोष्टी शिकायला मिळतात. त्यांच्यातील गुणांचा आपल्यावरही प्रभाव पडतो. त्याप्रमाणे झाडांच्या सहवासातही या सर्व गोष्टींचा अनुभव घेता येतो.

झाडांसाठी घरगुती संवर्धक (टॉनिक)

‘नारळातील पाणी (शहाळ्याचे नाही) हे झाडांसाठी उत्तम संवर्धक म्हणून कार्य करते. स्प्रेच्या बाटलीमध्ये हे मिश्रण घालून झाडांवर तुषारसिंचन करावे. झाडाला मोहोर येऊ लागल्यानंतर, फळे धरणे चालू झाल्यावर, तसेच फळांची वाढ होत असतांना अशा निरनिराळ्या अवस्थांमध्ये हे तुषारसिंचन लाभदायक ठरते.’

शेतात रासायनिक खते घालणे हे समष्टी पापच !

‘रासायनिक खते आणि कीटकनाशके यांचे परिणाम लगेचच दिसून येतात. या परिणामांना शेतकरी भुलतात; मात्र यांचे महाभयंकर दुष्परिणाम लक्षात घेतले जात नाहीत.

झाडांचे नियमित निरीक्षण करावे !

‘झाडांचे नियमितपणे निरीक्षण करणे’, हा लागवड करणार्‍यासाठी आवश्यक गुण आहे. बी पेरल्यानंतर कोणते बी किती दिवसांनी उगवते ? कुठल्या झाडाला किती पाणी लागते ? अशा अनेक गोष्टी निरीक्षणानेच समजतात.

मातीतील सूक्ष्म जिवाणूंचे महत्त्व

झाडासाठी आवश्यक असलेले मातीतील आणि हवेतील सर्व घटक मुळांना शोषून घेता येतील, अशा स्वरूपात परिवर्तित करून पुरवण्याचे कार्य जिवाणू करतात. भूमीतील जिवाणूंची संख्या आणि कार्य जितके अधिक, तितकी मातीची सुपिकता अधिक असते.

दुहेरी लाभ देणारी लसूण लागवड

मातीमध्ये ३ – ३ इंच अंतरावर बोटाने छिद्र करून एकेक पाकळी खोचावी. खोचतांना पाकळीचे शेंड्याकडील टोक वरच्या दिशेने असावे. वाफ्याच्या कडेने किंवा कुंडीत अगोदर लावलेल्या झाडाच्या बाजूने लसूण लावता येते. असे केल्याने लसणीच्या उग्र वासाने कीटक मुख्य पिकाजवळ येत नाहीत.

स्वतःच्या घरी झालेला भाजीपाला हा सर्वार्थाने उत्कृष्ट आहार !

‘उत्तम आहार कसा असावा?’, याचे निकष सांगतांना ‘तो Regional (आपल्या प्रदेशात उत्पन्न झालेला), Seasonal (ऋतुनूसार उत्पन्न झालेला), Original (नैसर्गिकपणे उत्पन्न झालेला) असावा’, असे म्हटले जाते. आपल्या घरच्या लागवडीतील पिके वरील तीनही निकष पूर्ण करतात.

कोणत्या झाडाला किती आणि कधी पाणी द्यावे ?

पावसाळ्यामध्ये पाणी देण्यावर आपले नियंत्रण नसते; परंतु अन्य ऋतूंमध्ये पुष्कळ वेळा झाडांच्या मुळांना आवश्यकतेपेक्षा अधिक प्रमाणात दिलेले पाणी, हे रोपे मरून जाण्याचे कारण असते.