‘इंद्राक्षी’ स्तोत्राची महती आणि सध्याच्या आपत्काळात त्याचे महत्त्व !
ज्वरशमन करण्याची आणि रोगनिवारण करण्याची शक्ति आदिशक्तीमध्ये आहे. मनुष्याने भक्तीभावाने आदिशक्तीच्या ‘इंद्राक्षी’ रूपाची स्तुती केल्यास सर्व ज्वर आणि रोग दूर होतील. श्रीविष्णूने नारदाला ‘इंद्राक्षीस्तुति’ सांगितली. नारदांनी ती सूर्याला आणि सूर्याने ती इंद्राला सांगितली. इंद्राने ही स्तुती सचीपुरंदर ऋषींना सांगितली. अशा प्रकारे सचीपुरंदर ऋषींकडून हे स्तोत्र मनुष्यजातीला मिळाले.