आता ७ नोव्हेंबर २०२३ पासून देहलीतील रामलीला मैदानावर हिंदु राष्ट्राच्या स्थापनेसाठी आमरण उपोषण करणार !
वर्ष २०२३ मध्ये भारतात हिंदु राष्ट्राची स्थापना होणारच असल्याने अशा उपोषणाची आवश्यकता भासणार नाही; मात्र हिंदु राष्ट्राची स्थापना होण्यासाठी अशा संत-महंतांनी देशभरात जागृती करून हिंदूंना संघटित केले पाहिजे ! – संपादक

अयोध्या (उत्तरप्रदेश) – १ ऑक्टोबरपर्यंत भारताला ‘हिंदु राष्ट्र’ घोषित केले नाही, तर २ ऑक्टोबरला जलसमाधी घेईन, अशी घोषणा करणारे येथील तपस्वी छावणीचे महंत परमहंस दास यांनी आता ७ नोव्हेंबर २०२३ पासून देहलीच्या रामलीला मैदानामध्ये आमरण उपोषण प्रारंभ करण्याची घोषणा केली आहे. केंद्र सरकारने १ ऑक्टोबरपर्यंत देशाला ‘हिंदु राष्ट्र’ घोषित न केल्याने महंत परमहंस दास जलसमाधी घेतील का ? हे पहाण्यासाठी तपस्वी छावणीबाहेर मोठी गर्दी जमली होती. पोलिसांचाही येथे मोठा बंदोबस्त होता.
महंत परमहंस दास म्हणाले की, विविध हिंदुत्वनिष्ठ संघटनांचे राष्ट्रीय अध्यक्ष आणि कोट्यवधी हिंदूंच्या निवेदनामुळे मी जलसमाधी घेण्याचा विचार रहित केला आहे. आपण सर्व मिळून प्रयत्न करू आणि पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या नेतृत्वामध्ये भारताला ‘हिंदु राष्ट्र’ घोषित करू.
संपादकीय : ‘इस्रो’पुढील आव्हाने !
गुरुकृपेच्या बळावर ‘सनातन प्रभात’ प्रसारमाध्यमाची निर्मिती आणि कार्य !
बनावट उत्पन्न दाखल्यांवर मिळालेले ‘आर्.टी.ई.’ प्रवेश रहित करा ! – माजी आमदार नरेंद्र पवार यांची मागणी
Pune Love-Jihad : हिंदु तरुणीला प्रेमजाळ्यात ओढण्याचा प्रयत्न करत सुफियान खान याच्याकडून मानसिक छळ !
HJS Demand : कुणाल कामरा आणि प्रकाश राज यांच्याविरुद्ध गुन्हा नोंदवा !
Warship ‘Malvan’ : भारतीय नौदलाकडून ‘मालवण’ युद्धनौकेच्या ‘वाघ नख’ दर्शवलेल्या नवीन बोधचिन्हाचे अनावरण