ज्ञानियांचा सहजभाव

‘श्रीमद्भगवद्गीतेत सांगितले आहे, ‘जो कर्मफलाचा आसरा न घेता कर्म करतो तो खरा योगी ! करणीय कर्म करणार्‍यापेक्षा महान, श्रेष्ठ कुणीही नाही. तोच संन्यासी, तोच योगी. केवळ निरग्नी वा अक्रिय हा संन्यासी वा योगी नाही. वरील व्याख्येप्रमाणे जीवन व्यतित केलेले प.पू. गुरुदेव डॉ. काटेस्वामीजी !

गुरुदेवांच्या वाङ्मय लेखनप्रपंचामागील कारण !

मानव जन्म भगवत्प्राप्तीसाठी तर आहे. त्यासाठी जर काही प्रयत्नच नाही केले, तर अखेरीला भगवंतच विचारील, ‘तुला जीवन दिले, काय केले तू या जीवनाचे ? काय मिळवले ? कोणती पूर्णता साधली ? कोणता महिमा प्राप्त केला ?

विज्ञानवाद

‘विज्ञानवादाचे अपत्य औद्योगीकरण ! तेथे नीती कशी नांदेल ? अर्थकामासक्त, चंगळवादी, भोगलोलुप, जडवादाच्या धुक्यात, मानव कल्याणाची सनातन हिंदु धर्म संस्कृतीची वाट हरवली आहे.’

विश्वातील परमात्म्यास जाणा !

‘वर्णव्यवस्थेत विषमता आहे. वैषम्य नाही. प्रकृतीच वैषम्याच्या भेदावर उभी आहे. वैषम्य आहे; म्हणून तर भेद आहेत; म्हणून तर सृष्टी आहे; म्हणून तर जीवन आहे. जीवनात नित्य नूतनता, ताजेपणा आणि रस आहे.

संध्या वंदन विधी

सूर्याेदयापूर्वी २ घंटे पूजा इत्यादी आन्हिक उरकल्यावर गायत्री मंत्रोपासनेकरता सर्वाेत्कृष्ट वेळ आहे. शास्त्रांनी सांगितले आहे की, अरुणोदयापर्यंत गायत्री मंत्र जप करावा. सूर्याेदयाला प्रातः संध्या करावी.’

मायेपासून निवारण करण्यासाठी भगवंताला शरण जाणे महत्त्वाचे !

हे प्रभु, तुझी ही माया तुझ्या दृष्टीरूपी अंगणात नृत्य करत आहे अन् काल, स्वभाव यांद्वारे सत्त्व-रज-तमोगुणी भाव दर्शवत आहे. ती माझ्या मस्तकावर चढून आतुर असल्याप्रमाणे माझे मर्दन करत आहे. हे नृसिंहा, मी तुला शरण आलो आहे. तूच मायेचे निवारण कर.

खरा कर्मसंन्यास कोणता ?

 ‘कर्म करून काय मिळणार ? अब्जपती झाला, अंतराळात उड्डाण करता आले, पाण्यावरून चालता आले आणि दुनियेत सर्वश्रेष्ठ विजेता झाला, तरी त्याने काय होणार ? ततः किम ? मरण टाळता येणार नाही.

युरोपियन संस्कृतीची असभ्यता !

व्यापार आणि सैन्य यांच्या जोरावर युरोपियन लोक जगभर पसरले. त्यामुळे त्यांची स्वत:च्या सभ्यतेची  (Civilization) स्थानिक संस्कृतीशी गाठ पडू लागली. त्यांनी दुसर्‍या कोणत्याही समाजाची सभ्यता जवळून पाहिली अथवा अनुभवली नाही.

निरहंकार्‍याची लक्षणे

निरहंकारी असतो, तो देह-इंद्रिय स्‍वतःची मानतच नाही. शरिराहून स्‍वतःला वेगळा मानतो. साक्षी मानतो. कर्म करतो आणि धारणा असते, ‘मी काही करत नाही. भगवंतच सगळे करतो. मी नव्‍हे’, ही त्‍याची धारणा असते.

भगवतीदेवीच्या चरणप्राप्तीचे महत्त्व !

भगवती, मूलाधारात असलेले ५६ किरण, मणिपूरच्या जलतत्त्वातील ५२, स्वाधिष्ठानच्या अग्नितत्त्वातील ६२, अनाहतमधील वायुतत्त्वातील ५४, विशुद्ध चक्रातील आकाशतत्त्वाचे ७२ आणि आज्ञाचक्रस्थ मनस्तत्त्वातील ६४ असे जे तुझे किरण आहेत त्या सर्वांहून तुझे चरणकमलयुगल हे वर आहेत.