हिंदुत्वनिष्ठ आणि हितचिंतक यांचा परात्पर गुरु डॉ. आठवले यांच्या प्रतीचा भाव !

परात्पर गुरु डॉ. जयंत आठवले, आपण ‘धर्मविचार हा माणसाच्या विचारशक्तीचा विकास करणारी गोष्ट आहे’, हा विचार प्रकर्षाने मांडलात आणि आपण ‘संत निर्माण करण्याचे तंत्र’ निर्माण केलेत, यांमुळे आपल्या जन्माला ‘अवताराचे स्थान’ प्राप्त झाले आहे.

समाजातील संतांना सनातन संस्था ‘आपली’ का वाटते ?

परात्पर गुरु डॉक्टरांची कृपा आणि शिकवण यांमुळे त्यांच्यासारखेच गुण सनातनचे संत आणि साधक यांच्यातही निर्माण झाले आहेत. या गुणांमुळे आता त्यांचेही समाजातील संतांशी आपुलकीचे नातेबंध निर्माण होत आहेत.

‘आपत्काळ’ हीसुद्धा भगवंताची एक लीला असून परात्पर गुरु डॉक्टर, श्रीसत्‌शक्ति (सौ.) बिंदा सिंगबाळ आणि श्रीचित्‌‌शक्ति ( (सौ.) अंजली गाडगीळ यांना शरण जाऊन आपत्काळाला सामोरे जाऊया !

आपत्काळ हा आपल्या सर्वांसाठी एक युद्धच आहे. त्याला सामोरे जाणे, ही साधनाच आहे. श्रीविष्णूची ही परीक्षा आपले प्रारब्ध आणि संचित यांची परीक्षा असून ही आपल्या गुरुनिष्ठेची अन् श्रद्धेचीही परीक्षा आहे. ही परीक्षा जेवढी कठीण आहे, तेवढाच या परीक्षेचा शेवट पुष्कळ गोड आहे.

देवता आणि गुरु यांची पूजा भावपूर्ण केल्यासच ते आपल्यावर प्रसन्न होऊन आपल्याला भरभरून आशीर्वाद देतील !

सर्वांच्या पालनपोषणाची काळजी वहाणार्‍या भगवंताची पूजा अशा प्रकारे ‘उरकणे’, याला देवपूजा म्हणता येईल का ? असे केल्यावर भगवंताने आपल्यावर कृपा तरी का करावी ?

परात्पर गुरु डॉ. आठवले यांच्यावर श्रद्धा ठेवून साधना करणार्‍या साधकांचे ते रक्षण करणार ! – सप्तर्षि

साधकांनी अर्जुनाप्रमाणे शरण जाऊन जगद्गुरु श्रीकृष्णाचा अवतार असलेले परात्पर गुरु डॉ. आठवले यांची अनन्य भावाने पूजा करण्याचे सप्तर्षींनी सांगितलेले महत्त्व

संत आणि मान्यवर यांनी जाणलेले परात्पर गुरु डॉ. आठवले यांचे अवतारत्व !

पूर्वीपासूनच समाजातील संत आणि अध्यात्मातील अधिकारी व्यक्ती यांनी परात्पर गुरु डॉक्टरांची अवतारी वैशिष्ट्ये जाणली होती. सूर्य उगवल्याचे सर्वांना सांगावे लागत नाही, ते आपोआपच कळते, तसेच परात्पर गुरु डॉक्टरांच्या अवतारत्वाची अनुभूती सर्वांना येते !

दैनिक ‘सनातन प्रभात’मध्ये प्रसिद्ध झालेल्या छायाचित्रांच्या माध्यमातून ईश्वराने श्रीसत्‌शक्ति (सौ.) बिंदा सिंगबाळ आणि श्रीचित्‌शक्ति (सौ.) अंजली गाडगीळ यांच्यातील एकरूपतेची दिलेली प्रचीती !

सद्गुरुद्वयींच्या एकरूपतेची प्रचीती ईश्वरानेच एका अनोख्या अनुभूतीच्या माध्यमातून पुन्हा एकदा दिली. ईश्वराची ही सुंदर लीला सनातनचे सद्गुरु राजेंद्र शिंदे यांना एका साधकाने लक्षात आणून दिली.

परात्पर गुरु डॉ. आठवले, श्रीसत्‌शक्ति (सौ.) बिंदा सिंगबाळ आणि श्रीचित्‌‌शक्ति (सौ.) अंजली गाडगीळ यांना महर्षींनी दिलेले वचन

गुरूंसाठी पृथ्वीवर आलेल्या साधकांकडे महर्षींचे दिवस-रात्र लक्ष आहे. हे तीनही गुरु जातांना त्यांची सर्व कीर्ती आपल्या साधकांना देऊन जाणार आहेत.

‘पुढे घराघरांत लोक तुला पूजतील’, या प.पू. भक्तराज महाराजांनी (प.पू. बाबांनी) परात्पर गुरु डॉक्टरांना दिलेल्या आशीर्वादाप्रमाणेच महर्षींनीही सांगणे आणि त्याची मिळत असलेली प्रचीती

हिरा कितीही लपवला तरी त्याचा प्रकाश लपत नाही किंवा अल्प होत नाही. चैतन्याच्या ओढीने प्रवास करणार्‍याला परात्पर गुरु डॉक्टरांचे छायाचित्र पाहून पहिल्याच दृष्टीक्षेपात ‘यात काहीतरी वेगळे आहे’, असे जाणवते आणि तो एका अनामिक अशा आकर्षण शक्तीने त्याकडे ओढला जातो.