सुराज्याच्या दिशेने…!
हिंदुद्वेष्ट्या नेहरू सरकारने या मातीशी एकरूप झालेली कुठलीच गोष्ट न स्वीकारता सर्व परकीय गोष्टींचा अंगीकार शासन आणि प्रशासन यांना करायला लावला. त्यामुळे भारताच्या सर्वाेत्तम कालगणनेतील ‘तिथी’ संस्कृतीचाही विसर पडला. सरकार सुराज्यासाठी प्रयत्न करत आहेच, ते अधिक वृद्धींगत होवोत, अशीच स्वातंत्र्यदिनाच्या निमित्ताने शुभेच्छा !
पूर्णत्यागी आणि साधनेद्वारे वासुदेवाचे दर्शन घेणारे योगी अरविंद यांच्यामुळे भारताला स्वातंत्र्य मिळणे !
‘‘मी स्वातंत्र्याची काळजी करत नाही, जे इतरांना हवे असते, त्या गोष्टींचे मला आकर्षण नाही. मला शक्ती हवी, जेणेकरून मी हा देश उभा करू शकेन आणि माझ्या प्रिय देशवासियांची सेवा करू शकेन. राष्ट्र आणि मानवता यांसाठी मी अथक परिश्रम करू शकेन.’’
खुदीराम बोस यांच्यासारख्या क्रांतीकारकांची देशभक्ती आणि निर्भयता !
क्रांतीकारक खुदीराम बोस यांना इंग्रज न्यायाधीश म्हणतात, ‘‘तू बाँब बनवून इंग्रज अधिकार्यांना मारले आहेस; म्हणून आज तुला मृत्यूदंड ठोठावण्यात येत आहे.’’ निर्णय ऐकतांनाही खुदीराम यांच्या चेहर्यावर हास्य होते.