गोवंश तस्करी करतांना पकडलेल्या वाहनांचा तस्करीसाठी पुन्हा वापर !


मुंबई, २४ जून (वार्ता.) – गोवंशियांच्या तस्करीसाठी वापरल्यामुळे जप्त केलेली वाहने कायदेशीर प्रक्रियेनंतर सोडली जातात; परंतु तीच वाहने पुन्हा गोवंश तस्करीसाठी वापरली जात असल्याचा धक्कादायक प्रकार उघड झाला आहे. राज्यातील विविध भागांत १७ ठिकाणी एकदा जप्त केलेली वाहने पुन्हा गोवंश तस्करीसाठी वापरण्यात आल्याचे उघड झाले आहे. आमदार प्रवीण तायडे, आमदार अतुल भातखळकर, आमदार अमोल जावळे आणि आमदार संग्राम जगताप यांनी विधानसभेत उपस्थित केलेल्या तारांकित प्रश्नावर गृहविभागाकडून ही माहिती देण्यात आली आहे. गोवंश तस्करीसाठी त्याच वाहनांचा पुन:पुन्हा होणारा वापर लक्षात घेता जप्त करण्यात येणार्‍या वाहनांविषयी सरकारला भविष्यात कठोर भूमिका घ्यावी लागणार आहे.