साम्यवादी वृत्तपत्रातून राज्यघटनेविषयी चुकीचे वृत्त प्रसारित करून लोकांमध्ये भीती पसरवण्याचा प्रयत्न !
‘सध्या भारताची राज्यघटना धोक्यात आहे’, असे चित्र निर्माण करण्याचा या साम्यवादी वृत्तपत्रे आणि विरोधी शक्ती यांचा प्रयत्न दिसून येतो. ‘डॉ. बाबासाहेब आंबेडकरांची राज्यघटना पालटली जाणार’, असे वातावरण सिद्ध करून गरिबांमध्ये संभ्रम निर्माण करण्याचे हे एक षड्यंत्र तर नाही ना, असा प्रश्न पडतो.