महापुरासारख्या आपत्तीत साधकांच्या माध्यमातून परात्पर गुरु डॉ. आठवले काळजी घेत असल्याची सांगली येथील श्री. दत्तात्रय कुलकर्णी यांना आलेली प्रचीती !
विश्रामबागला पोचल्यानंतर आम्हाला गुरुमाऊलींची प्रीती अनुभवण्यास मिळाली. आम्ही घरातून निघण्यापूर्वी आम्हाला श्रीमती नंदा दौंडे यांचा २ – ३ वेळा भ्रमणभाष आला. त्यांच्या घरचा पत्ता देऊन त्या ‘तुम्ही कधी येणार ?’, असे विचारत होत्या.