‘कल्पवृक्ष हौसिंग वसाहत’ येथील अवैध बांधकाम तात्काळ न हटवल्यास आंदोलन ! – विश्व हिंदु परिषद आणि बजरंग दल यांचे महापालिकेत निवेदन

येथील शहापूर हद्दीतील ‘कल्पवृक्ष हौसिंग वसाहत’ येथे चालू असलेल्या अवैध बांधकामाची तक्रार २८ जानेवारी २०२२ ला विश्व हिंदु परिषदेकडून तक्रार करण्यात आली होती.

‘द लीजेंड ऑफ मौला जट्ट’ पाकिस्तानी चित्रपट भारतात प्रदर्शित होऊ देणार नाही !

फवाद खान याचा ‘द लीजेंड ऑफ मौला जट्ट’ हा पाकिस्तानी चित्रपट भारतात प्रदर्शित करण्यासाठी हालचाली चालू आहेत. चीड आणणारी गोष्ट म्हणजे भारतीय आस्थापनांनी चित्रपट प्रदर्शनासाठी पायघड्या घातल्या आहेत.

गुजरात विधानसभा निवडणुकीत ‘एम्.आय.एम्.’च्या सर्व १३ उमेदवारांची अनमात रक्कम जप्त !

महाराष्ट्र प्रदेशाध्यक्ष खासदार इम्तियाज जलील दारूण पराभवाविषयी म्हणाले आमच्या पक्षाच्या १३ उमेदवारांना मिळून १ लाख मते मिळाली आहेत, हे आमच्यासाठी महत्त्वाचे आहे.

चिंचवड (पुणे) येथे आजपासून श्रीमन् महासाधू श्री मोरया गोसावी संजीवन समाधी महोत्सव !

श्रीमन् महासाधू श्री मोरया गोसावी संजीवन समाधी महोत्सव १० ते १४ डिसेंबर या कालावधीत चिंचवड येथे साजरा होणार आहे. या निमित्ताने चिंचवड देवस्थान ट्रस्ट, पिंपरी-चिंचवड महापालिका आणि ग्रामस्थ यांनी वतीने धार्मिक कार्यक्रम, सुगम संगीत, जुगलबंदी, व्याख्यान, ..

कसायांशी संगनमत करून कारवाई करण्यास टाळाटाळ करणार्‍या हडपसर (पुणे) येथील पोलीस निरीक्षकावर कारवाई करावी ! – गोरक्षकांचे पुणे पोलिसांना निवेदन

सराईतपणे गोतस्करी करणारा मयनू कुरेशी ५ डिसेंबर या दिवशी फलटण येथे त्याच्या गाडीमधून १२ लहान-मोठ्या म्हशी अवैधपणे कत्तलीसाठी घेऊन जात असल्याची माहिती गोरक्षकांना मिळाल्यानंतर गोरक्षकांनी ती गाडी हडपसर येथील मांजरीच्या दिशेने जात असतांना पकडली.

नक्षलवादी चळवळीचे समर्थक कोबाड गांधी यांच्या आत्मचरित्रात्मक पुस्तकाला राज्यशासनाचा अनुवादाचा पुरस्कार !

सातत्याने नक्षलवादी आणि माओवादी यांच्याकडून जनता, पोलीस अन् सैनिक यांच्या हत्या, होत असतांना नक्षलवाद्यांचे समर्थक कोबाड गांधी यांना पुरस्कार देणे हे लज्जास्पद आहे.

‘लव्ह जिहाद’ विरोधी कायदा बनवण्यासाठी अन्य राज्यांतील कायद्यांचा अभ्यास करणार ! – देवेंद्र फडणवीस, उपमुख्यमंत्री

‘लव्ह जिहाद’ कायदा संमत झाल्यानंतर महाराष्ट्रातील ‘लव्ह जिहाद’ची प्रकरणे रोखण्यास आणि त्यावर प्रतिबंध घालण्यास साहाय्य होईल’,असे भाजपच्या नेत्यांचे म्हणणे आहे.

सोलापूर, अक्कलकोट भागांतील नागरिकांना कुणी भडकावत आहे का ? याची पडताळणी झाली पाहिजे ! – शंभूराज देसाई, पालकमंत्री

महाराष्ट्रात सीमाप्रश्नी वातावरण वेगळे वळण घेऊ लागले आहे. केंद्र सरकारने दोन्ही राज्यांची बैठक घेऊन समन्वयाने तोडगा काढावा, ही महाराष्ट्र सरकारची भूमिका आहे.

नाशिक येथील सिंहस्थ कुंभमेळ्याच्या साधूग्रामसाठी ३५४ एकर भूमीची आवश्यकता ! 

सिंहस्थ कुंभमेळ्यासाठी येणारे लाखो साधू-महंत यांच्यासाठी तपोवनात उभारण्यात येणार्‍या साधूग्राम, तसेच अन्य सुविधांसाठी यापूर्वी कह्यात घेतलेली ७० एकर जागा वगळता जवळपास ३५४ एकर जागा संपादित करावी लागणार आहे.