
संभाजीनगर – नुकत्याच झालेल्या गुजरात विधानसभेच्या निवडणुकीत ‘एम्.आय.एम्.’ने १३ जागांवर उमेवार उभे केले होते. त्यांपैकी २ उमेदवार हिंदु होते; पण एकालाही यश मिळाले नाही. सर्व १३ उमेदवारांची अनमात रक्कम (डिपॉझिट) जप्त झाले आहे. निवडणुकीत किमान मतेही मिळवू न शकणार्या उमेदवाराची (त्याने उमेदावारी अर्ज भरतांना भरलेली) अनामत रक्कम निवडणूक आयोगाकडून जप्त केली जाते. ही त्या पक्षासाठी मोठी नामुष्की समजली जाते.
आमच्या १३ उमेदवारांना १ लाख मते मिळाली, हे आमच्यासाठी महत्त्वाचे आहे ! – खासदार इम्तियाज जलील

‘एम्.आय.एम्.’चे महाराष्ट्र प्रदेशाध्यक्ष खासदार इम्तियाज जलील यांनी गुजरातमध्ये प्रचार मोहिमेत सहभाग घेतला होता. तेथील दारूण पराभवाविषयी ते म्हणाले की, आमच्या पक्षाच्या १३ उमेदवारांना मिळून १ लाख मते मिळाली आहेत, हे आमच्यासाठी महत्त्वाचे आहे. हा आमचा प्रारंभ आहे. नुकत्याच झालेल्या देहली महानगरपालिकेच्या निवडणुकीत आमच्या १५ उमेदवारांना ५० सहस्र मते मिळाली आहेत, हेही लक्षात घेतले पाहिजे.
अभिजीत दीपके याच्याशी बोलून आंदोलनाची दिशा ठरवणार ! – उद्धव ठाकरे
देशातील लोकशाहीने कात टाकली आहे ! – शरद पवार, अध्यक्ष, राष्ट्रवादी काँग्रेस शरद पवार गट
पत्रकार आदित्य गोरेगावकर यांच्यावर जीवघेणे आक्रमण
गोदावरी नदीकाठावरील गावांमध्ये पूरस्थिती उद्भवण्याची शक्यता !
मालाड (मुंबई) येथे जगन्नाथ रथयात्रेला मूळ मार्गाने नेण्यास मुंबई उच्च न्यायालयाची अनुमती
पंढरपूर कॉरिडॉरचे काम कुणावरही अन्याय न करता योग्य पुनर्वसन करून पूर्ण करणार ! – देवेंद्र फडणवीस, मुख्यमंत्री