मातृभाषेचा सन्‍मान हवाच !

प्रत्‍येकाची भाषा आणि संस्‍कृती यांचा आपण आदर करायला शिकले पाहिजे. विदेशी आस्‍थापने या इंग्रजी भाषेवर आग्रही असतील, तर भारतासमवेत व्‍यवहार करतांना आपण त्‍यांना आपली राष्‍ट्रभाषा ‘हिंदी’ यांवर व्‍यवहार करण्‍यासाठी आग्रही असले पाहिजे.

अतिरेक टाळा !

भ्रमणभाषवर छोटे ‘रिल्स’ (काही सेकंदांचे व्हिडिओ) किंवा ‘व्लॉग’ (व्हिडिओद्वारे सांगण्यात येणारी माहिती) करण्याचे वेड पुष्कळ वाढलेले आहे. काही जण हे व्हिडिओ घरात बनवतात, तर काही जण आपापल्या कामाच्या ठिकाणी करतात किंवा काही जण मित्र-मैत्रिणींसमवेत ते सिद्ध करतात.

पावसाळ्यापूर्वीची खड्डे समस्या ?

पावसाळा चालू होण्यासाठी दीड-दोन मासांचा अवकाश असतांना रस्त्यांवरील खड्डे बुजवण्यासाठी १५ मेपर्यंत ठेकेदार नेमण्याचे आदेश नाशिक महापालिका आयुक्त
डॉ. चंद्रकांत पुलकुंडवार यांनी बांधकाम विभागाला दिले. गेल्या पावसाळ्यातही नाशिकमधील बहुतांश रस्ते खड्डेमय बनले होते.

मानसिकता पालटायला हवी !

‘द केरल स्टोरी’ हा चित्रपट हिंदु मुलींना ‘लव्ह जिहाद’च्या जाळ्यात कसे अडकवले जात आहे ? हे दाखवणारा आणि सर्वांमध्ये विशेषतः हिंदूंमध्ये जागृती होण्यासाठी बनवण्यात आलेला चित्रपट आहे, असे म्हणावे लागेल. असे असले, तरी ‘जोपर्यंत संकट आपल्या घरापर्यंत येत नाही, तोपर्यंत त्याचे मला काय ?’

बंदीवानांना धर्मशिक्षण द्या !

निरनिराळ्या गुन्ह्यातील बंदीवानांमध्ये सुधारणा घडवून त्यांना उत्तम नागरिक म्हणून समाजात पुन्हा पाठवण्यासाठी नागपूरच्या मध्यवर्ती कारागृहाने बंदीवानांना उच्च शिक्षणाची सोय उपलब्ध करून दिली. शैक्षणिक वर्ष २०२२ मध्ये ‘इंदिरा गांधी राष्ट्रीय मुक्त विद्यापीठ, देहली’ यांच्या वतीने घेण्यात आलेल्या परीक्षेत..

‘सेवक’ वृत्ती का नाही ?

जनतेच्या करातून वेतन मिळणारे ‘कोणत्याही अपेक्षेविना जनतेची सेवा करू’, अशी शासकीय नोकरीच्या वेळी शपथ घेणारे पुढे सगळेच विसरून जातात. लोकप्रतिनिधी, प्रशासकीय अधिकारी आणि जनता सर्वच जण देशाचे सेवक आहेत.

कर्तव्यदक्षच अधिकारी हवेत !

पुण्यातील बंडगार्डन परिसरात असलेल्या राजाबहादूर मिलच्या मैदानात प्रसिद्ध संगीतकार ए.आर्. रेहमान यांच्या कार्यक्रमाचे आयोजन (कॉन्सर्ट) करण्यात आले होते. हा कार्यक्रम रात्री १० वाजल्यानंतरही चालू होता.

कहां फेके कचरा…?

प्रतिदिन ‘गाडीवाला आया घरसे कचरा निकाल…’, असे गाणे ऐकवणार्‍या कचरा गाडीने जनतेला स्वच्छतेच्या दृष्टीने बर्‍याच चांगल्या सवयी लावल्या. कचरा इतरत्र फेकू नये, सुका आणि ओला कचरा निराळा करून ठेवावा इत्यादी; पण ही गाडी आता सामान्यांना त्रास देऊ लागली आहे, असे नुकत्याच घडलेल्या प्रसंगातून लक्षात येते.

प्रसारमाध्यमांनी राष्ट्रहित जपावे !   

जसाजसा काळ पुढे चालला आहे, तसा या वाहिन्यांमधील परिपक्वपणा, समंजसपणा वाढण्याच्या ऐवजी बालिशपणा, बाजारू वृत्ती, उथळ बातम्या देण्याचे प्रमाण वाढत आहे. त्यामुळे प्रसारमाध्यमांनी अंतर्मुख होऊन कोणत्या बातम्यांना प्राधान्य द्यायला हवे ? याचा विचार करावा !

सेलिब्रेटींचा पोरखेळ !

भरकटलेल्‍या तरुणाईला योग्‍य वाट दाखवण्‍याची आवश्‍यकता आहे. त्‍यासाठी धर्मशिक्षण घेणे आणि धर्माचरण करणे यांचा पाया निर्माण करायला हवा, तसेच सेलिब्रेटींच्‍या कृतींचा आदर्श ठेवायचा का ? हेही तरुणाईने ठरवायला हवे !