पूजा चव्हाण आत्महत्या प्रकरणी गुन्हा नोंदवण्यात यावा, यासाठी न्यायालयात याचिका, ५ मार्च या दिवशी सुनावणी होणार

याचिकेत म्हटले आहे की, पूजा चव्हाण हिचा मृत्यू संशयास्पद परिस्थितीत झाला असून तिच्या अनेक ऑडिओ क्लीपही प्रसारित झाल्या आहेत. यामध्ये अनेक मोठ्या व्यक्तींची नावे आहेत. असे असतांना या प्रकरणाचे सखोल अन्वेषण झालेले नाही. त्यामुळे आरोपी कधीही मृत्यूच्या प्रकरणातील पुरावे नष्ट करू शकतात.

राज्यातील महाविद्यालयांत विद्यार्थ्यांची ५०० कोटी रुपयांची अनामत रक्कम पडून !

विद्यार्थ्यांचे पैसे त्यांना परत केले जावेत, यासाठी पत्रक काढूनही त्यांना अनामत रक्कम वेळेत न मिळणे हा विद्यार्थ्यांवरील अन्यायच आहे. यासाठी उत्तरदायी कोण ? विद्यार्थ्यांना पैसे मिळावेत, यासाठी कार्यपद्धत घालणे आवश्यक आहे.

आईने पंजाबी पोशाख घातल्याने मुलाची आत्महत्या

नागठाणे (जिल्हा सातारा) येथील एका मुलाने त्याच्या आईने पंजाबी पोशाख घातल्याच्या कारणावरून आत्महत्या केली. शेरू शैकत भोसले असे मुलाचे नाव आहे.

महाराष्ट्र आणि केरळ येथून जाणारे प्रवासी कोरोना निगेटिव्ह असणे आवश्यक ! – उपमुख्यमंत्री, कर्नाटक

सांगली जिल्ह्याच्या लगत कर्नाटक सीमेवर कागवाड येथेही कर्नाटक सरकारने पडताळणी नाके उभारले आहेत. कोरोना ‘निगेटिव्ह’ असणार्‍यांनाच कर्नाटकात प्रवेश दिला जात आहे.

मृत्यूच्या दिवशी संजय राठोड यांच्या भ्रमणभाषवरून पूजा यांना ४५ ‘मिस्ड कॉल’ ! – चित्रा वाघ, भाजप

हे फोन का करण्यात येत होते ? याविषयी पोलिसांनी अन्वेषण करून त्याची माहिती जनतेला द्यावी, अशी मागणीही वाघ यांनी केली आहे.

आनेवाडी आणि खेड-शिवापूर येथील पथकर नाक्यावर बनावट देयके देऊन फसवणूक

कर्मचारी कोट्यवधींचा महसूल बुडवेपर्यंत कोणालाही कसे लक्षात आले नाही ?

गुरुप्रतिपदेनिमित्त श्री वटवृक्ष स्वामी महाराज मंदिरात आयोजित केलेले धार्मिक कार्यक्रम रहित : केवळ नित्य पूजा आणि आरती होणार

कोरोनाच्या पार्श्‍वभूमीवर मंदिर समितीचा निर्णय

१० वी आणि १२ वी च्या परीक्षा रहित करण्याचा निर्णय नाही !

मुंबई – इयत्ता १० वी आणि १२ वी च्या परीक्षा रहित करण्याचा कोणताही निर्णय घेण्यात आलेला नाही, तसेच परीक्षेविना विद्यार्थ्यांना उत्तीर्णही करता येणार नाही. सामाजिक माध्यमांमध्ये आलेल्या बातम्या खोट्या आहेत, असे प्रतिपादन शिक्षणमंत्री वर्षा गायकवाड यांनी केले.

गांजा लागवड प्रकरणी अटकेत असलेल्या परदेशी आरोपींचा कारागृहात धिंगाणा

गुन्हेगार कारागृहात मोडतोड करतात म्हणजे त्यांना पोलिसांचा धाक नाही का ? तसेच पोलीसही त्यांच्याकडून मार खातात म्हणजे त्यांना प्रशिक्षण नाही का ?

केरळमध्ये हिंदुत्वाचे कार्य करण्यासाठी ‘अन्नपूर्णा फाऊंडेशन’ची झाली स्थापना !

‘हिंदु ‘हेल्पलाईन’चे राज्य अध्यक्ष श्री. बिनिल सोमसुंदरम् यांनी वसंतपंचमीला म्हणजेच १६ फेब्रुवारी या दिवशी येथील ‘अन्नपूर्णा फाऊंडेशन’ या नावाने हिंदुत्वासाठी कार्य करणार्‍या संस्थेची गुरुकृपेने स्थापना केली.