गोवा : लुईझिन फालेरो यांचे राज्यसभा खासदारपदाचे त्यागपत्र

मला बंगालचा प्रतिनिधी या नात्याने खासदारपद प्राप्त झाल्याने मला गोव्याचे प्रश्न मांडण्यास आणि खासदार निधीचा गोव्यासाठी वापर करण्यास अडचणी येत होत्या. यासाठी मी खासदार पदाचे त्यागपत्र दिले आहे.

गोव्यात मद्यसेवनामुळे प्रतिवर्षी ३०० जणांचा मृत्यू

मद्यविक्रीतून कर मिळावा यासाठी रात्री उशिरापर्यंत मद्यालये चालू ठेवण्याचे हे आहेत दुष्परिणाम ! एकूण रुग्णांच्या २५ टक्के आणि त्यात २० वर्षे वयाचे तरुणही मद्यसेवन केल्याने उद्भवलेल्या रोगांनी ग्रस्त असणे ही गंभीर गोष्ट असून याविषयी आता जनतेनेच विचार करायला हवा !

श्री तुळजाभवानी मंदिरात भ्रष्टाचार करणार्‍या दोषींवर कारवाई करावी !

मंदिराच्या देवधनाचा अपवापर करणारे आणि भाविकांना दर्शनापासून वंचित ठेवणारे यांवर देवीची अवकृपा नाही का होणार ?

सोलापूर येथे लव्ह जिहादच्या उद्देशाने महिलेचा विनयभंग करणार्‍या धर्मांधावर गुन्हा नोंद !

अशा प्रकारांना आळा बसण्यासाठीच राज्यात लवकरात लवकर ‘लव्ह जिहाद’विरोधी कायदा अस्तित्वात यावा, असे हिंदूंना वाटते !

इंदापूर तालुक्यात (पुणे) कत्तलीसाठी नेणार्‍या ३९ वासरांची सुटका; एका धर्मांधावर गुन्हा नोंद

केवळ गोहत्याबंदीचे कायदे करून उपयोग नाही. कायद्याची प्रभावी कार्यवाही आणि धर्मांधांना कठोर शिक्षा केल्याविना गोहत्या थांबणार नाही !!

मंत्रालयातील ३८ विभागांच्या फेर्‍या वाचणार, टपाल एकाच ठिकाणी देता येणार !

‘आपले सरकार’ वेब पोर्टलच्या माध्यमातून ५११ पैकी ३८७ सेवा नागरिकांना दिल्या जातात. शासनाचा कारभार अधिकाधिक लोकाभिमुख करण्यासाठी यामध्ये आणखी १२४ सेवांचा समावेश करण्यात येणार आहे.

मंत्रालयाच्या प्रवेशद्वारासमोर आत्महत्येचा प्रयत्न करणार्‍यावर गुन्हा नोंद !

या प्रकरणी अशोक चौरे यांनी संशयितांची नावे सांगूनही अद्याप कुणाला अटक करण्यात न आल्यामुळे त्यांनी आत्महत्येचे पाऊल उचलल्याचे त्यांनी पोलिसांना सांगितले.

#Exclusive : तुटलेली आसने, भिंतींची पडझड यांमुळे दापोली (रत्नागिरी) बसस्थानकाची दुरवस्था !

दैनिक ‘सनातन प्रभात’च्या प्रतिनिधींना लक्षात आलेली विविध शहारांतील बसस्थानकांची दुःस्थिती येथे मांडत आहोत. बसस्थानकांची ही विदारक स्थिती पालटली तर ‘प्रवाशांच्या सेवेसाठी’ हे परिवहन मंडळाचे ब्रीदवाक्य अधिक खरे ठरेल.

स्वातंत्र्यवीरांचा जन्मदिन महाराष्ट्रात ‘स्वातंत्र्यवीर गौरवदिन’ म्हणून साजरा होणार !

स्वातंत्र्यवीर सावरकर यांचा २८ मे हा जन्मदिवस महाराष्ट्र शासन ‘स्वातंत्र्यवीर गौरवदिन’ म्हणून साजरा करणार आहे. या दिवशी स्वातंत्र्यवीर सावरकर यांच्या विचारांचा प्रचार-प्रसार करण्यासाठी विविध कार्यक्रम आयोजित केले जातील..

जीवनातील दुःखांना धैर्याने सामोरे जाण्याचे बळ केवळ साधनेनेच मिळते ! – सद्गुरु स्वाती खाडये, धर्मप्रचारक, सनातन संस्था

आपल्या जीवनातील ८० टक्के दुःखांच्या मागे आध्यात्मिक कारण असते आणि त्यावर उपाय म्हणून साधना करणे आवश्यक आहे. जीवनातील दुःखांना धैर्याने सामोरे जाण्याचे बळ आणि सतत टिकणारा आनंद केवळ साधनेनेच मिळतो.