पिंपरी-चिंचवड महापालिकेची पर्यावरणाच्या विषयीची सहानुभूती केवळ गणेशोत्सवापुरतीच ! – दिगंबर काशिद, पर्यावरणासाठी काम करणारे कार्यकर्ते

पुणे महापालिकेच्या ढोंगी पर्यावरणवादाची ‘पोलखोल’ करण्यासाठी पर्यावरणप्रेमींनो संघटित व्हा !

पिंपरी-चिंचवड शहरातील सर्व क्षेत्रीय अधिकार्‍यांनी श्री गणेशमूर्ती विसर्जनस्थळी वैयक्तिक लक्ष द्यावे ! – उल्हास जगताप, अतिरिक्त आयुक्त

‘जनसंवाद सभे’ मध्ये श्री गणेशमूर्ती विसर्जन घाटांवर महापालिकेने विसर्जनाच्या पुढील दिवसांसाठी अधिक मनुष्यबळासह सुविधा पुरवाव्यात, अशी मागणी नागरिकांनी केली.

सामाजिक माध्यमांत सक्रीय राहिल्याने गोव्यातील विद्यार्थ्यांची शैक्षणिक अधोगती, तर विद्यार्थिनी लैंगिक शोषणाच्या बळी ! – समूपदेशकांचे मत

राष्ट्राची युवा पिढी अशा प्रकारे व्यसने आणि अनैतिकता यांना बळी पडल्यास राष्ट्राचे रक्षण कोण करणार ? त्यामुळे ही केवळ सामाजिक समस्या न रहाता राष्ट्रीय समस्याच असल्याचे जाणून आतापासूनच उपाययोजना करायला हवी !

नागपूर येथील कोराडी तलावाजवळील नांदा परिसरात ४ सहस्र राष्ट्रध्वज पोत्यात भरून फेकले !

स्वातंत्र्याच्या ‘अमृत महोत्सवा’निमित्त देशात ‘हर घर तिरंगा’ मोहीम राबवण्यात आली होती. कोट्यवधी लोकांनी स्वतःच्या घरावर तिरंगा ध्वज लावला होता. अनेकांना ध्वज उपलब्ध झाले नव्हते. ‘हर घर तिरंगा’ मोहिमेमुळे देशभावना जागृत होईल, असा त्यामागचा उद्देश होता;

कॉ. पानसरे हत्या प्रकरणातील खटला कोल्हापुरात चालवण्यासाठी शासनाकडे आवेदन सादर केल्याची आतंकवादविरोधी पथकाची न्यायालयात माहिती !

कॉ. पानसरे हत्या प्रकरणातील खटला कोल्हापूर येथील न्यायालयात चालवावा, असा प्रस्ताव शासनाकडे सादर केला आहे, अशी माहिती राज्य आतंकवादविरोधी पथकाने न्यायालयात दिली. पथकाच्या वतीने पोलीस अधीक्षक तुषार दोशी यांनी न्यायालयात ही माहिती दिली.

गौतम नवलखा यांचा जामीन अर्ज सत्र न्यायालयाने फेटाळला !

कोरेगाव भीमा आणि एल्गार परिषद प्रकरणातील आरोपी गौतम नवलखा यांचा जामीन अर्ज मुंबई सत्र न्यायालयातील राष्ट्रीय अन्वेषण यंत्रणेच्या (एन्.आय.ए.) न्यायालयाने ५ सप्टेंबर या दिवशी फेटाळला आहे.

ट्रॅकमन्समुळे रेल्वेचा अपघात टळला

कल्याण येथे जलद डाऊन मार्गावरील रेल्वेच्या रुळाला तडा गेल्याचे लक्षात आल्यानंतर कर्तव्यावर असलेल्या २ ट्रॅकमन्सनी (रूळ दुरुस्त करणारे कर्मचारी)  प्रसंगाचे गांभीर्य लक्षात घेत लाल सिग्नल दाखवून एक्सप्रेस थांबवण्याचा यशस्वी प्रयत्न केला.

मंचर, चाकण येथील २ मिठाई विक्रेत्यांवर अन्न आणि औषध प्रशासनाची कारवाई !

स्वीट खव्याचा (गुजरात बर्फी) वापर करून मिठाई बनवत असल्याचे आढळल्यास मिठाई विक्रेत्यांवर कारवाई करण्यात येईल, असे अन्न आणि औषध प्रशासन विभागाचे सहआयुक्त संजय नारागुडे यांनी कळवले आहे.

पुण्यातील मानाच्या श्री गणेशमूर्ती विसर्जन मिरवणुकीच्या विरोधातील याचिका मुंबई उच्च न्यायालयाने फेटाळली

विसर्जन मिरवणुकीच्या वेळी आधी मानाचे ५ गणपति जातील, त्यानंतर लहान गणपति जाणार हे बंधनं का ?, असा प्रश्न अन्य गणेशोत्सव मंडळांकडून करण्यात आला होता. मानाच्या गणपतींच्या अगोदर छोट्या मंडळांना विसर्जन मिरवणुकांची अनुमती द्यावी, अशी त्यांची मागणी होती.

यापुढे लव्ह जिहादमध्ये अडकलेल्या मुलींसाठी कार्य करीन ! – नवनीत राणा, खासदार

आतापर्यंत मी अमरावती येथील लव्ह जिहादला बळी पडलेल्या मुलींना, त्यांच्या कुटुंबियांना साहाय्य करत आले असून यापुढे जिथे जिथे अशा घटना घडतील तेथील कुटुंबांना मी साहाय्य करणार आहे. देशातील लव्ह जिहाद नष्ट करायचा असून त्याचा प्रारंभ जळगावातून होत आहे.