
अमरावती – आतापर्यंत मी अमरावती येथील लव्ह जिहादला बळी पडलेल्या मुलींना, त्यांच्या कुटुंबियांना साहाय्य करत आले असून यापुढे जिथे जिथे अशा घटना घडतील तेथील कुटुंबांना मी साहाय्य करणार आहे. देशातील लव्ह जिहाद नष्ट करायचा असून त्याचा प्रारंभ जळगावातून होत आहे. ‘आमचे युवक, महिला आणि मुली यांनी नेमके काय केले पाहिजे ?’ याचा संदेश मी त्यांना नक्की देईन, असे वक्तव्य अपक्ष खासदार नवनीत राणा यांनी केले. त्या आणि त्यांचे पती आमदार रवि राणा हे जळगाव येथील ‘महाराणा प्रताप मित्र मंडळा’च्या वतीने आयोजित ‘सामूहिक हनुमानचालिसा पठण’ कार्यक्रमासाठी जळगावला आले होते. ‘पोलीस कोठडीतील १४ दिवस आम्ही हनुमानचालिसाचे पठण केले’, असेही राणा यांनी या वेळी सांगितले.
संपादकीय भूमिकाअसे किती लोकप्रतिनिधी पुढे येऊन म्हणतात ? |
गोव्यात शैक्षणिक वर्ष पुन्हा जूनपासून चालू करण्याचा प्रस्ताव
‘सनबर्न’च्या आयोजकांना दणका : सुरक्षा ठेव रक्कम जप्त करण्यास राष्ट्रीय हरित लवादाची मान्यता
आहारात साखर, तेल अल्प करा आणि व्यायामावर भर द्या ! – डॉ. प्रमोद सावंत, मुख्यमंत्री
नैऋत्य मौसमी पावसाचे (मान्सूनचे) केरळमध्ये आगमन
छत्रपती संभाजीनगर येथे ४० सहस्र रुपयांची लाच घेणार्या ग्रामविकास अधिकार्यांना अटक !