ईश्वर आणि इच्छेचे फळ

गुरुदेव डॉ. काटेस्वामीजी

‘ईश्वर नित्यमुक्त आहे. सकाम कर्म करून भगवंताला फळ मागितले, तर तो अवश्य फळ देतो; पण ते फळ बद्ध करते, अंगलट येते. फळच मागितले नाही, तर फळ द्यायचे त्याचे स्वातंत्र्य निरंतर (कायम) रहाते. योग्य वेळी आणि प्रारब्ध अनुकूल असेल, अशा वेळी नेमके तो फळ देतो. जे फळ अनेक पटींनी फळते. न मागणार्‍यालाच सगळे मिळते. भगवंताची प्रसन्नता, कृपाही त्यालाच लाभते. यज्ञकर्मही भगवंताला समर्पण केल्याने या सृष्टीच्या अनंत फाफट पसार्‍यात त्याला त्या कर्मफळाने असा अवसर (संधी) दिला असता की, त्याचे कल्याण झाले असते. भक्त म्हणतो, ‘भगवंता, तुझी इच्छा पूर्ण होऊ दे. माझ्या इच्छेचे मूल्य शून्य आहे !’

– प.पू. गुरुदेव डॉ. काटेस्वामीजी

(साभार : मासिक ‘घनगर्जित’, मार्च २०२४)