…श्रीकृष्णाची कृपा होण्याची हीच संधी असे ।

पू. शिवाजी वटकर

गुरु नानकापूर्वी कुणीही शीख नव्हता, तरीही खलिस्तानवाद का ?
प्रेषित महंमद यांच्या आधी एकही मुसलमान नव्हता, तरीही जिहाद का ?
कार्ल मार्क्सच्या आधी कुणी साम्यवादी नव्हते, तरीही साम्यवाद का ? ।। १ ।।

कृष्णापूर्वी राम, रामापूर्वी ऋषिमुनी अन् आरंभी सनातन वैदिक अनुयायी होते ।
सनातन धर्म अनादी असतांना हिंदूंची सध्याची स्थिती दयनीय का ?
जागृत अन् संघटित होण्याचा विचार हिंदूंनी करण्याची वेळ आली आहे ।। २ ।।

विचार करूनी शारीरिक, मानसिक अन् आध्यात्मिक बळ वाढवण्याची हीच वेळ असे ।
धर्माचरण, धर्माभिमान आणि साधना करून श्रीकृष्णाची कृपा होण्याची हीच संधी असे ।
लक्षात असू द्यावे सुक्यासह ओलेही जळून जाण्याची वेळ जवळ आली असे ।। ३ ।।

– (पू.) शिवाजी वटकर, सनातन आश्रम, देवद, पनवेल. (१७.९.२०२४)