जितेंद्र आव्हाड यांना अटक झालीच पाहिजे, ही आंबेडकरवादी जनतेची मागणी ! – जगदीश गायकवाड, ज्येष्ठ आंबेडकरवादी नेते, पनवेल शहर

छायाचित्र सौजन्य : हिंदुस्थान पोस्ट

मुंबई – रायगड जिल्हा पोलीस अधीक्षक आणि राज्याचे गृहमंत्री यांना मी जितेंद्र आव्हाड यांना महाडमध्ये प्रवेश देऊ नका, अशी मागणी केली होती. यावर कृती केली असती, तर डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांचा अवमान झाला नसता. डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांचा अवमान करणार्‍या जितेंद्र आव्हाड यांना अटक झालीच पाहिजे, ही आंबेडकरवादी जनतेची मागणी आहे, असे वक्तव्य नवीन पनवेल येथील ज्येष्ठ आंबेडकरवादी नेते जगदीश गायकवाड यांनी केली आहे.

डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांनी वर्ष १९२७ मध्ये मनुस्मृती जाळली, ती पुन्हा जाळण्याची आवश्यकता काय ? जितेंद्र आव्हाड यांनी मूर्खपणाची कृती केली आहे.  जितेंद्र आव्हाड यांना चालवणारी यंत्रणा कोणती आहे ? महाराष्ट्रात दंगल घडवण्याचा प्रयत्न जितेंद्र आव्हाड करत आहेत, असा आरोपही गायकवाड यांनी केला आहे.