
नागपूर – अलमट्टी धरणाची उंची मर्यादेबाहेर वाढवण्याचा कर्नाटक सरकार प्रयत्न करत आहे. यामुळे कोल्हापूर, सांगली जिल्ह्यांतील असंख्य गावे पाण्याखाली जातील. त्यासाठी राज्य सरकारने तातडीने केंद्र सरकारचे लक्ष वेधून कर्नाटक सरकारला रोखावे, अशी मागणी शिवसेनेचे आमदार चंद्रदीप नरके यांनी औचित्याच्या सूत्रावर बोलतांना विधानसभेत केली.
ते म्हणाले की, अलमट्टी धरणाची उंची वाढवली, तर कोल्हापूर आणि सांगली जिल्ह्यांत महापूर येण्याचा धोका या आधीही वर्तवण्यात आला आहे. यासंदर्भात वडनेरे समितीचा अहवाल आला आहे. तरी कर्नाटक सरकार धरणाची उंची वाढवत आहे, हे थांबवले पाहिजे.
स्थापनेनंतर १० वर्षांनी ‘महाआयटी’ने विधीमंडळात सादर केला पहिला वार्षिक अहवाल !
ठाणे येथे शाळेत प्रवेश देण्यासाठी लाच घेणार्या २ खासगी व्यक्ती कह्यात !
वटपौर्णिमेनिमित्त ठाणे जिल्ह्यातील श्री मलंगगडावर मलंगनाथांच्या समाधीची भक्तीभावाने आरती !
कुंभमेळा प्राधिकरणाच्या नावे ७० कोटी रुपयांचे बनावट कार्यआदेश; गुन्हे नोंद ! – एकनाथ शिंदे, उपमुख्यमंत्री
राज्यातील जनगणना पहिल्या टप्प्यातील माहिती संकलन १०० टक्के डिजिटल पद्धतीने पूर्ण ! – मुख्यमंत्री
महाराष्ट्रात अणूऊर्जा प्रकल्पासाठी सामंजस्य करार; मात्र अद्याप जागेची निश्चिती नाही !