वर्ष १९४७ मध्ये पाकिस्तानातील हिंदूंची लोकसंख्या २१ टक्के इतकी होती. आज ती २ टक्के इतकीच आहे. बांगलादेश आणि अफगाणिस्तान येथेही हीच अवस्था आहे. कुठे गेले हे सगळे लोक ? पाकिस्तान, बांगलादेश आणि अफगाणिस्तान येथील धार्मिक छळामुळे फसलेल्या हिंदु, बौद्ध, जैन, शीख आणि पारशी यांनी कुठे जायचे ? त्यांना सन्मानाने जगण्याची संधी देणे, हे फक्त आणि फक्त भारताचे कर्तव्य आहे. ते पूर्ण करण्यासाठी ‘नागरिकत्व सुधारणा कायदा’ (सीएए) लागू केल्याविषयी मोदी सरकारचे मनःपूर्वक अभिनंदन आणि धन्यवाद !

सत्तातूर काँग्रेसने घाईघाईने लागू केलेल्या फाळणीची अपुरी राहिलेली प्रक्रिया आज पूर्ण झाली. आपल्या दुर्दैवी बांधवांना न्याय मिळवून देण्याची व्यवस्था आज आपल्या देशाने शेवटी कार्यवाहीत आणली. या निर्णयाला विरोध करणार्या, स्वतःला ‘निधर्मी’ (सेक्युलर) आणि मानवतावादी म्हणवून घेणार्या तथाकथित पुरोगाम्यांचा विकृत, द्वेषपूर्ण चेहरा आता पूर्णपणे उघडा पडला आहे.
– श्री. अभिजित जोग, ‘असत्यमेव जयते’ आणि ‘जगाला पोखरणारी डावी वाळवी’ या पुस्तकांचे लेखक
(श्री. अभिजित जोग यांच्या फेसबुकवरून साभार)
लैंगिक अत्याचाराच्या प्रकरणात पीडित धर्मांध मुलांना प्रत्येकी १० लाख रुपये हानीभरपाई देण्याचा मद्रास उच्च न्यायालयाचा आदेश !
‘श्री समर्थ रामदास – एक अभ्यास’ ग्रंथ : अभ्यासपूर्ण मननीय, चिंतनीय आणि संदर्भ ग्रंथ
सिनेमा आणि स्वतःची स्वप्ने : यशाविषयी सिनेमा काय प्रकट करतो ?
श्री शिवराज्याभिषेक आणि खोटे कथानक (नॅरेटिव्ह) !
निकृष्ट दर्जाच्या सुपारीवर अन्न आणि औषध प्रशासनाची कारवाई
मुख्य आरोपींवर ‘मकोका’ अंतर्गत कारवाई करणार !