२९ मार्चला रत्नागिरीत जगद्गुरु श्री शंकराचार्य यांच्या विचारांवर एक दिवसांचे चर्चासत्र

जगद्गुरु श्री शंकराचार्य

रत्नागिरी – कविकुलगुरु कालिदास संस्कृत विश्वविद्यालय, रत्नागिरी उपकेंद्र आणि गोगटे जोगळेकर महाविद्यालय, संस्कृत विभाग यांच्या सहयोगाने, भारतीय भाषा समितीच्या आर्थिक साहाय्याने खास रत्नागिरीकरांसाठी जगद्गुरु शंकराचार्य यांच्या विचारांवर आधारित एक दिवसांचे चर्चासत्राचे आयोजन करण्यात आले आहे. हे चर्चासत्र  २९ मार्च २०२४ या दिवशी शहरातील कविकुलगुरु कालिदास संस्कृत विश्वविद्यालयाच्या  रत्नागिरी उपकेंद्रात सकाळी १० वाजता आयोजित करण्यात आलेले आहे.

विशेष म्हणजे हे चर्चासत्र सर्वांसाठी निःशुल्क असून केवळ नावनोंदणी करणे आवश्यक आहे. चर्चासत्राच्या दिवशी कार्यक्रमाच्या ठिकाणी सर्वांसाठी उपाहार, मध्यान्ह भोजन आणि चहापान यांची व्यवस्था करण्यात येणार आहे. शिवाय चर्चासत्रात सहभागी व्यक्तींना मान्यवरांच्या हस्ते प्रमाणपत्र देण्यात येणार आहे.

नाव नोंदणी साठी कश्मिरा दळी (९०२८४९४१९९) आणि अविनाश चव्हाण (८३९०८५४९२६) यांच्याशी संपर्क साधावा.

जगद्गुरु श्री शंकराचार्य हे सनातन संस्कृती आणि संपूर्ण भारत वर्षासाठी पूज्य स्थानी आहेत. भारताची भौगोलिक, सांस्कृतिक आणि आध्यात्मिक क्षेत्रातील एकता अन् अखंडता कायमस्वरूपी दृढ करण्याकरता जगद्गुरु श्री शंकराचार्यांनी स्वत:चे संपूर्ण जीवन समर्पित केले. भारताच्या एकात्मतेसाठी जगद्गुरु श्री शंकराचार्य यांचे योगदान हे अमूल्य आहे. या सगळ्या गोष्टींवर या चर्चासत्राच्या माध्यमातून प्रकाश टाकला जाणार आहे. त्यामुळे रत्नागिरीकरांनी या चर्चासत्रात सहभागी होऊन जगद्गुरु श्री शंकराचार्य यांचे कार्य आणि त्यांचे योगदान ‘याचि देहि, याचि डोळा अनुभव घ्यावा’, असे आवाहन रत्नागिरी उपकेंद्राच्या वतीने करण्यात आले आहे.