रिक्शा चोरी करणारी धर्मांधांची टोळी अटकेत

अल्पसंख्यांक असलेले धर्मांध गुन्हेगारीत मात्र बहुसंख्यांक !

प्रतिकात्मक चित्र

ठाणे, २३ सप्टेंबर (वार्ता.) – भिवंडी गुन्हे शाखेच्या पोलिसांनी वाहन चोरीच्या घटनांचे अन्वेषण करून ४ जणांच्या धर्मांधांच्या टोळीला अटक केली आहे. त्यांच्याकडून २० लाख रुपयांच्या १८ रिक्शा जप्त केल्या असून तब्बल १२ गुन्ह्यांची उकल केली आहे. रशीद युनुस खान, सय्यद अली महंमद अली शेख उपाख्य मुन्ना, एहतेशाम अब्दुल समी सिद्दीकी, जमील अहमद महंमद तय्यब अन्सारी अशी अटक केलेल्यांची नावे आहेत. या प्रकरणी पोलीस पुढील अन्वेषण करत आहेत.