मदुराई येथे रेल्वेला लागलेल्या आगीमध्ये ९ प्रवाशांचा मृत्यू

काही प्रवासी अवैधरित्या घेऊन जात असलेल्या सिलिंडर्समुळे आग लागल्याचा प्राथमिक अंदाज !

मदुराई (तमिळनाडू) – लक्ष्मणपुरी येथून रामेश्‍वरम् येथे निघालेल्या एका रेल्वेला मदुराई येथे आग लागली. यात रेल्वेचा एक डबा संपूर्ण जळाला. या दुर्घटनेत ९ जणांचा मृत्यू झाला, तर काही जण घायाळ झाले. ही पर्यटकांसाठीची विशेष रेल्वेगाडी होती. या घटनेचे रेल्वे प्रशासनाकडून अन्वेषण केले जात आहे. आग लागलेल्या डब्यामध्ये काही प्रवासी चोरून गॅस सिलिंडर्स नेत होते आणि या सिलिंडर्समुळेच आगीचा भडका उडाला, असा प्राथमिक अंदाज वर्तवला जात आहे.

संपादकीय भूमिका

प्रवासी अवैधरित्या सिलिंडर्स नेत असतील, तर रेल्वे पोलीस काय करत होते ? जर असे घडले असेल, तर संबंधित पोलिसांवरही कारवाई झाली पाहिजे !