
सार्या जगात माझा, भारत बलवान आहे ।
सार्या जगात त्याचा मोठाच मान आहे ।
सार्या जगात माझा, भारत महान आहे ।
जय भारत, जय हिंदुस्थान ।। धृ. ।।
मर्यादा पुरुषोत्तम रामाचा वास इथेच झाला ।
पूर्णावतार कृष्णाचा रास इथेच झाला ।
सार्या संतमहात्म्यांचा उदय इथेच झाला ।
सार्या जगात याची संस्कृती महान आहे ।। १ ।।
तात्या टोपे, राणी लक्ष्मीबाई आणि छत्रपती शिवाजी ।
महाराणा प्रताप, सुभाष, गुरु गोविंद सिंहजी ।
भगतसिंह, सावरकर, मंगल पांडे, छत्रपती संभाजी ।
सार्या जगात त्यांचे शौर्य महान आहे ।। २ ।।
विश्वशांतीचा संदेश इथून जगात गेला ।
बुद्ध, महावीर, कबिराचा उदय इथेच झाला ।
नीती, सदाचाराचा संस्कार इथेच झाला ।
सार्या जगात गीतेला मोठाच मान आहे ।। ३ ।।
मायभूला अजून बलशाली, प्रगत करूया ।
इथे संपन्नता, समानता, राष्ट्रभक्ती जोपासूया ।
आपल्या स्वप्नातला अखंड भारत बनवूया ।
सार्या जगात माझा भारत भाग्यवान आहे ।। ४ ।।
– डॉ. प्रकाशदादा देशमुख, अकोला
उन्हाळा इतका तीव्र का होत आहे ? विदेशी झाडे का नको ?
परीक्षांमधील प्रश्नपत्रिका फुटण्यामुळे विद्यार्थांच्या आणि समाजाच्या भवितव्याविषयी प्रश्नचिन्ह !
धर्म काटेकोर आचरण्याचे महत्त्व !
देवाला नैवेद्य दाखवून स्वतःच खायचा ! काय अर्थ आहे मग त्या नैवेद्य दाखवण्याचा ?
काँग्रेस नेते राहुल गांधी यांच्या दुहेरी नागरिकत्वप्रकरणी प्रयागराज (उत्तरप्रदेश) उच्च न्यायालयाच्या लक्ष्मणपुरी खंडपिठासमोर पेच !