महाराष्ट्रात १३ ते १५ ऑगस्ट कालावधीत ‘घरोघरी तिरंगा’ अभियान !

मुंबई – महाराष्ट्रात १३ ते १५ ऑगस्ट या कालावधीत ‘घरोघरी तिरंगा’ हे अभियान राबवले जाणार आहे. राज्याचे सांस्कृतिक कार्यमंत्री सुधीर मुनगंटीवार यांनी मंत्रालयात एका कार्यक्रमात या अभियानाची घोषणा केली. या निमित्ताने मंत्रालयातील सर्व अधिकारी आणि मान्यवर यांना कापडी तिरंगा ध्वज देण्यात आला.