मराठवाडा, अमरावती आणि नागपूर विभागांत ३ वर्षांत ७ सहस्र ९२ शेतकर्‍यांच्‍या आत्‍महत्‍या !

मुंबई, २५ जुलै (वार्ता.) – अमरावती विभागात ३ सहस्र ४५२, मराठवाडा विभागात २ सहस्र ६८३, तर नागपूर विभागात ९५७ शेतकर्‍यांनी आत्‍महत्‍या केल्‍या आहेत, अशी माहिती मदत आणि पुनर्वसन विभागाकडून विधानसभेत देण्‍यात आली. राज्‍यातील शेतकर्‍यांच्‍या आत्‍महत्‍या रोखण्‍याविषयी आमदार कुणाल पाटील यांनी उपस्‍थित केलेल्‍या तारांकित प्रश्‍नावर सरकारकडून लेखी उत्तर देण्‍यात आले. वेळेअभावी या प्रश्‍नावर सभागृहात चर्चा होऊ शकली नाही. सततचा अवकाळी पाऊस, गारपीट, नापीक भूमी आदींमुळे शेतकरी कर्जबाजारी असल्‍याचे सूत्र या तारांकित प्रश्‍नात उपस्‍थित केले होत. यामध्‍ये तथ्‍य असल्‍याचे मंत्र्यांनी लेखी उत्तर दिले आहे.