मुंबई, २५ जुलै (वार्ता.) – अमरावती विभागात ३ सहस्र ४५२, मराठवाडा विभागात २ सहस्र ६८३, तर नागपूर विभागात ९५७ शेतकर्यांनी आत्महत्या केल्या आहेत, अशी माहिती मदत आणि पुनर्वसन विभागाकडून विधानसभेत देण्यात आली. राज्यातील शेतकर्यांच्या आत्महत्या रोखण्याविषयी आमदार कुणाल पाटील यांनी उपस्थित केलेल्या तारांकित प्रश्नावर सरकारकडून लेखी उत्तर देण्यात आले. वेळेअभावी या प्रश्नावर सभागृहात चर्चा होऊ शकली नाही. सततचा अवकाळी पाऊस, गारपीट, नापीक भूमी आदींमुळे शेतकरी कर्जबाजारी असल्याचे सूत्र या तारांकित प्रश्नात उपस्थित केले होत. यामध्ये तथ्य असल्याचे मंत्र्यांनी लेखी उत्तर दिले आहे.
सनातन प्रभात > Location > आशिया > भारत > महाराष्ट्र > मराठवाडा, अमरावती आणि नागपूर विभागांत ३ वर्षांत ७ सहस्र ९२ शेतकर्यांच्या आत्महत्या !
मराठवाडा, अमरावती आणि नागपूर विभागांत ३ वर्षांत ७ सहस्र ९२ शेतकर्यांच्या आत्महत्या !
नूतन लेख
कुंकळ्ळी (गोवा) येथील विनयभंग प्रकरणी शारीरिक शिक्षकाच्या बडतर्फीची शिफारस
सिंधुदुर्ग जिल्ह्यातील किनारपट्टी परिसरातील शाळा दत्तक घेणार ! – विष्णु मोंडकर, अध्यक्ष, गाबीत फिशरमेन फेडरेशन
पुणे येथे विसर्जन घाट बंद केल्याने नाईलाजाने भाविकांना श्री गणेशमूर्ती कृत्रिम हौदात विसर्जित कराव्या लागल्या !
आमदारांच्या पात्रतेविषयीच्या सुनावणीचे थेट प्रक्षेपण करण्याची काँग्रेसची मागणी !
छत्रपती शिवाजी महाराज संग्रहालयाचे काम अंतिम टप्प्यात ! – तेजस गर्गे
दगडूशेठ ट्रस्टने ब्राह्मणभोजन घातल्याने आव्हाडांना पोटशूळ !