मुसळधार पावसामुळे हिमाचल प्रदेशला ४ सहस्र कोटी रुपयांची हानी !

शिमला (हिमाचल प्रदेश) – मौसमी पावसाने उत्तर भारताला चांगलेच झोडपले असून हिमाचल प्रदेशात गेले काही दिवस मुसळधार पाऊस चालू आहे. यामुळे आतापर्यंत अनेक ठिकाणी भूस्खलन झाले असून पाण्याच्या लोंढ्याला लोकांना सामोरे जावे लागले.

आतापर्यंत १७ लोक मृत्यूमुखी पडले आहेत. यामुळे राज्याला किमान ३ ते ४ सहस्र कोटी रुपयांची हानी झाली आहे. राज्यातील लाहौल स्पिती, तसेच कुल्लू जिल्ह्यांमध्ये पुराच्या पाण्यामुळे अडकलेल्या ३०० पर्यटकांना सुरक्षित ठिकाणी स्थलांतरित करण्याचा प्रयत्न केला जात आहे.