|

न्यूयॉर्क (अमेरिका) – नैराश्यावर मात करण्यासाठी लोक औषधे घेतात. गेल्या काही वर्षांत याचे प्रमाण पुष्कळ प्रमाणात वाढले आहे. असे असले, तरी यासंदर्भात केलेल्या संशोधनामध्ये प्रत्येक १ सहस्त्र भारतियांमध्ये केवळ ९ जणांनाच मानसिक तणावावर औषधोपचार करावा लागतो. ‘द वर्ल्ड ऑफ स्टॅटिस्टिक्स’ने प्रसारित केलेल्या आकडेवारीनुसार भारतात ९, लॅटव्हिया २१, रशिया २३, तर दक्षिण कोरियात प्रत्येक १ सहस्त्र नागरिकांमागे २७ जणांना औषधे घ्यावी लागतात. विकसित देशांपैकी युनायटेड किंगडम १०८, अमेरिका ११०, ऑस्ट्रेलिया १२२ आणि कॅनडा येथे प्रत्येक १ सहस्त्र कॅनडियन नागरिकांमागे तब्बल १३० जणांना नैराश्यावर मात करण्यासाठी औषधे घ्यावी लागतात. या संशोधनाच्या आकडेवारीनुसार जगात भारतात मानसिक त्रासांचे प्रमाण सर्वांत अल्प आहे.
संपादकीय भूमिकाभारतात आजही धर्माचरणाचे प्रमाण पुष्कळ अधिक आहे. याउलट पाश्चात्त्य देशांत चंगळवाद फोफावला असल्याने तेथील लोकांना नैराश्याला सामोरे जावे लागते. यातून साधना आणि अध्यात्म यांची कास धरणे का आवश्यक आहे, हे लक्षात येते ! |
जर्मनीमध्ये जिहाद्याने ‘एलजीबीटीक्यू’ समुदायाच्या संचलनामध्ये घुसवली व्हॅन : १ जणा ठार, तर १६ जण घायाळ
पाकमध्ये टीटीपीच्या आक्रमणात १२ सैनिकांसह १५ जण ठार
Nepal Indian Currency: नेपाळने भारतीय चलनावरील बंदी उठवली
‘पॅट्रियट इंटरसेप्टर’ क्षेपणास्त्रांच्या तुटवड्यामुळे ट्रम्प यांनी इराणवरील सर्वांत मोठे आक्रमण केले स्थगित
Hunger Index Pakistan : पाकिस्तानमधील उपासमारीत तब्बल ३७ टक्क्यांची वृद्धी ! – संयुक्त राष्ट्रे
CIA Officer Bangladesh Visit : अमेरिकी गुप्तचर संस्थेच्या माजी अधिकार्याच्या बांगलादेशाच्या गुप्त दौर्यामुळे चर्चांना उधाण