|

नवी देहली – ईशान्य भारतातील मेघालय, नागालँड आणि त्रिपुरा या ३ राज्यांतील विधानसभा निवडणुकीची मतमोजणी २ मार्च या दिवशी सायंकाळी उशिरापर्यंत चालू होती. त्रिपुरा आणि नागालँड येथे भाजपने सत्ता राखली आहे. त्रिपुरामध्ये भाजपला बहुमत मिळाले आहे, तर नागालँडमध्ये नॅशनल डेमोक्रॅटिक प्रोग्रेसिव्ह पार्टी आणि भाजप यांच्या युतीने १९ जागांवर विजय मिळवला आहे, तर १७ ठिकाणी ती आघाडीवर असल्याने तेथे युतीचे सरकार येणार असल्याचे निश्चित झाले आहे. मेघालयमध्ये नॅशनल पीपल्स पार्टीला सर्वाधिक जागा मिळाल्या असल्या, तरी बहुमत न मिळाल्याने तेथे त्रिशंकू स्थिती निर्माण झाली आहे. त्रिपुरामध्ये भाजपने ३१ ही बहुमताची संख्या प्राप्त केली आहे, तर माकप आणि टिपरा मोथा पार्टी ११ जागांवर पुढे आहे.

मेघालय – ६० , एन्.पी.पी. – २५, भाजप – ३ , काँग्रेस – ५ , तृणमूल काँग्रेस – ५, टीपीपी – ६, इतर – १६
नागालँड – ६०, भाजप – १२, एन्.डी.पी.पी. – २५ ,काँग्रेस – ०, एन्पीपी – ५, इतर – १८
त्रिपुरा – ६०, भाजप – ३३ ,टिपरा मोथा पार्टी – १३, माकप – ११ ,काँग्रेस – ३
पालक आणि ज्येष्ठ यांनी आजच्या तरुण पिढीशी संवाद साधावा ! – प.पू. सरसंघचालक डॉ. मोहनजी भागवत
महाविद्यालयांमध्ये गुरु-शिष्य परंपरेची महती सांगणार्या व्याख्यानांना उत्स्फूर्त प्रतिसाद
सासष्टी तालुक्यातील १ कोटी चौरस मीटरहून अधिक भूमी ‘विकासनिषिद्ध क्षेत्र’ म्हणून घोषित
जंतरमंतरवरील ‘नौटंकी’ : ‘वोक टूलकिट’चाच आविष्कार !
‘नीट’ आंदोलनाच्या हेतूचे ‘तीन तेरा’ !
देशभरातील सायबर फसवणुकीचे धागेदोरे यवतमाळच्या वणीत !