लांजा (जि. रत्नागिरी) – फाल्गुन शुक्ल द्वितीया ते फाल्गुन अमावस्या म्हणजेच २१ फेब्रुवारी ते २१ मार्चपर्यंत छत्रपती संभाजी महाराज बलिदानमासाचे पालन केले जात आहे. त्यानिमित्त लांजा येथील शिवाजी चौक, साटवली रोड येथे प्रतिदिन रात्री ८.३० ते ९ या वेळेत धर्मप्रेमी एकत्र येत आहेत.

छत्रपती संभाजी महाराजांना फितुरीने कसबा येथे अटक करण्यात आली. त्यानंतर क्रूरकर्मा औरंगजेबाने छत्रपती संभाजी महाराजांचे अतोनात हाल करत कसबा ते वढू बुद्रुकपर्यंत त्यांची धिंड काढली आणि शेवटी शंभूराजांना वढू बुद्रुक येथे वीरमरण आले. अतोनात छळ होऊनही शंभूराजांनी हिंदु धर्म सोडला नाही कि औरंगजेबापुढे ते झुकले नाहीत. शंभूराजांना झालेल्या वेदनांची जाण तरुणांना व्हावी, यासाठी श्री शिवप्रतिष्ठान हिंदुस्थानच्या वतीने बलिदानमास पाळला जातो. ‘बलिदानमास पाळल्यामुळे हिंदु धर्म आणि हिंदु राष्ट्र यांविषयी तरुणांमध्ये मोठ्या प्रमाणात जागृती होत आहे. तरी सर्व राष्ट्रभक्त आणि शंभूराजेप्रेमी यांनी या बलिदानमासात प्रत्यक्ष सहभागी व्हावे’, असे आवाहन श्री शिवप्रतिष्ठान हिंदुस्थानच्या वतीने करण्यात आले आहे.
मुलींमध्ये शौर्य आणि आत्मविश्वास निर्माण करण्यासाठी स्वसंरक्षण प्रशिक्षण आवश्यक ! – प्रा. (सौ.) ज्योती वाघमारे, खासदार, शिवसेना
रेल्वेमार्गाने येणार्या बांगलादेशी घुसखोरांचा बंदोबस्त करा ! – सकल हिंदु समाजाचे पोलीस अधीक्षकांना निवेदन
गोपाळगड शासनाचा असून सर्वांसाठी खुला : अफवांवर विश्वास ठेवून कायदा हातात घेऊ नका !
गुणवत्ता आणि अन्नसुरक्षा यांविषयी ‘गोकुळ’ संघाकडून कधीही तडजोड करण्यात आलेली नाही !
सावरकर घराण्यातील ‘बाई’, ‘माई’ आणि ‘ताई’ राष्ट्रभक्तीचा मूर्तीमंत आदर्श ! – डॉ. शुभा साठे
वाहतूक कोंडी आणि अपघाताचा धोका यांमुळे कारवाईची चेतावणी