लांजा (जि. रत्नागिरी) – फाल्गुन शुक्ल द्वितीया ते फाल्गुन अमावस्या म्हणजेच २१ फेब्रुवारी ते २१ मार्चपर्यंत छत्रपती संभाजी महाराज बलिदानमासाचे पालन केले जात आहे. त्यानिमित्त लांजा येथील शिवाजी चौक, साटवली रोड येथे प्रतिदिन रात्री ८.३० ते ९ या वेळेत धर्मप्रेमी एकत्र येत आहेत.

छत्रपती संभाजी महाराजांना फितुरीने कसबा येथे अटक करण्यात आली. त्यानंतर क्रूरकर्मा औरंगजेबाने छत्रपती संभाजी महाराजांचे अतोनात हाल करत कसबा ते वढू बुद्रुकपर्यंत त्यांची धिंड काढली आणि शेवटी शंभूराजांना वढू बुद्रुक येथे वीरमरण आले. अतोनात छळ होऊनही शंभूराजांनी हिंदु धर्म सोडला नाही कि औरंगजेबापुढे ते झुकले नाहीत. शंभूराजांना झालेल्या वेदनांची जाण तरुणांना व्हावी, यासाठी श्री शिवप्रतिष्ठान हिंदुस्थानच्या वतीने बलिदानमास पाळला जातो. ‘बलिदानमास पाळल्यामुळे हिंदु धर्म आणि हिंदु राष्ट्र यांविषयी तरुणांमध्ये मोठ्या प्रमाणात जागृती होत आहे. तरी सर्व राष्ट्रभक्त आणि शंभूराजेप्रेमी यांनी या बलिदानमासात प्रत्यक्ष सहभागी व्हावे’, असे आवाहन श्री शिवप्रतिष्ठान हिंदुस्थानच्या वतीने करण्यात आले आहे.
पोलिसांनी १५ दिवसांमध्ये आरोपपत्र प्रविष्ट करून जलदगती न्यायालयात खटला चालवावा ! – आमदार गोपीचंद पडळकर
पू. संभाजीराव भिडेगुरुजी यांची ‘लेट्सअप न्यूज पोर्टल’कडून मानहानी
सांस्कृतिक कार्य संचालनालयाच्या वतीने १५ जुलैला रत्नागिरी येथे विशेष कार्यक्रम
सामूहिक शेतीतून आघारी येथे चारसूत्री भात लागवडीचा यशस्वी प्रारंभ
वन विभाग आणि कॉर्पोरेट ‘सी.एस्.आर्.’च्या संयुक्त प्रयत्नातून १० लाख रुपयांचा निधी संमत
बारसू-सोलगाव अणूऊर्जा प्रकल्पाच्या विरोधात पंचायत समितीचा एकमुखी ठराव