मुंबई – राज्यशासनाच्या वतीने ८ फेब्रुवारी या दिवशी आयोजित करण्यात येणारा ‘ज्ञानोबा तुकाराम पुरस्कार’ सोहळा पुढे ढकलण्यात आला आहे, अशी माहिती सांस्कृतिक कार्य संचालनालयाने दिली आहे. वर्ष २०१९-२०,२०२०-२१, २०२१-२२ आणि २०२२-२३ या वर्षांचे ‘ज्ञानोबा तुकाराम पुरस्कार’ विविध मान्यवरांना प्रदान करण्याचा कार्यक्रम आळंदी येथे प्रस्तावित करण्यात आला होता. पुरस्कारप्राप्त सन्माननीय बाबा महाराज सातारकर यांच्या पत्नीचे दुःखद निधन झाल्यामुळे ते कार्यक्रमाला उपस्थित राहू शकणार नाहीत, तर श्री बद्रीनाथ तनपुरे महाराजांनी ‘प्रकृती अस्वास्थ्यामुळे, तसेच बाबा महाराज सातारकर यांच्यावर कोसळलेल्या दुःखाचा विचार करून कार्यक्रमाला उपस्थित रहाणार नाही’, असे कळवले आहे.
सनातन प्रभात > Location > आशिया > भारत > महाराष्ट्र > आळंदी येथे ८ फेब्रुवारीला होणारा ‘ज्ञानोबा तुकाराम पुरस्कार’ सोहळा पुढे ढकलला !
आळंदी येथे ८ फेब्रुवारीला होणारा ‘ज्ञानोबा तुकाराम पुरस्कार’ सोहळा पुढे ढकलला !
नूतन लेख
- एवढे अनधिकृत बांधकाम होईपर्यंत प्रशासन झोपले होते का ?
- श्रीरामनवमीला गोरक्षकांवर प्राणघातक आक्रमण होऊनही त्यांनी ७ गोवंशियांचे प्राण वाचवले !
- मोशी, चिखली (पुणे) येथे ‘नीलेश बोराटे सोशल फाऊंडेशन’चा श्रीरामनवमी उत्सव !
- पुणे येथे होर्डिंग कोसळल्याच्या प्रकरणी होर्डिंग मालकाला नोटीस !
- पुणे येथील ‘सिटी इंटरनॅशनल स्कूल’कडून ‘आर्.टी.ई.’तील प्रवेश घेतलेल्या विद्यार्थ्यांना अनुत्तीर्ण केल्याचा आरोप !
- नाशिक येथे अवैध सावकार वैभव देवरे याने भाजप पदाधिकार्याकडून २० लाख रुपयांच्या बदल्यात ३ कोटी रुपयांची वसुली केली !