आळंदी येथे ८ फेब्रुवारीला होणारा ‘ज्ञानोबा तुकाराम पुरस्‍कार’ सोहळा पुढे ढकलला !

मुंबई – राज्‍यशासनाच्‍या वतीने ८ फेब्रुवारी या दिवशी आयोजित करण्‍यात येणारा ‘ज्ञानोबा तुकाराम पुरस्‍कार’ सोहळा पुढे ढकलण्‍यात आला आहे, अशी माहिती सांस्‍कृतिक कार्य संचालनालयाने दिली आहे. वर्ष २०१९-२०,२०२०-२१, २०२१-२२ आणि २०२२-२३ या वर्षांचे ‘ज्ञानोबा तुकाराम पुरस्‍कार’ विविध मान्‍यवरांना प्रदान करण्‍याचा कार्यक्रम आळंदी येथे प्रस्‍तावित करण्‍यात आला होता. पुरस्‍कारप्राप्‍त सन्‍माननीय बाबा महाराज सातारकर यांच्‍या पत्नीचे दुःखद निधन झाल्‍यामुळे ते कार्यक्रमाला उपस्‍थित राहू शकणार नाहीत, तर श्री बद्रीनाथ तनपुरे महाराजांनी ‘प्रकृती अस्‍वास्‍थ्‍यामुळे, तसेच बाबा महाराज सातारकर यांच्‍यावर कोसळलेल्‍या दुःखाचा विचार करून कार्यक्रमाला उपस्‍थित रहाणार नाही’, असे कळवले आहे.