हे भारताला लज्‍जास्‍पद !

अभिनेते शरद पोंक्षे

‘जर तुम्‍ही १४ ऑगस्‍ट १९४७ पर्यंतचा इतिहास वाचला, तर एक महापुरुष जन्‍माला येतो, तो संपेपर्यंत दुसरा महापुरुष जन्‍माला येतो. शंकराचार्य जन्‍माला आले, मग ज्ञानेश्‍वर माऊली जन्‍माला आले, मग समर्थ रामदासस्‍वामी जन्‍माला आले, त्‍यानंतर संत तुकाराम महाराज जन्‍माला आले. त्‍याच काळात छत्रपती शिवाजी महाराज जन्‍माला आले. पेशवे जन्‍माला आले, तात्‍या टोपे जन्‍माला आले. झाशीची राणी, त्‍यानंतर चापेकर बंधू जन्‍माला आले, सावरकर, टिळक जन्‍माला आले. अशातच १५ ऑगस्‍ट १९४७ आले आणि त्‍यानंतर महापुरुष जन्‍माला येणे बंद झाले’, असे विधान अभिनेते शरद पोंक्षे यांनी ट्‍विटरवर प्रसारित केलेल्‍या व्‍हिडिओमध्‍ये केले आहे.’ (१४.१.२०२३)