ग्रहणकाळात जेवणे चुकीचे

निरोगी जीवनासाठी आयुर्वेद : लेखांक ८८

वैद्य मेघराज पराडकर

सूर्यचन्द्रग्रहे भुक्त्वा प्राजापत्येन शुद्ध्यति । – देवलस्मृति

अर्थ : सूर्य किंवा चंद्र यांच्या ग्रहण काळात भोजन करणे चुकीचे आहे. अशी चूक झाल्यास प्रायश्चित्त म्हणून ‘प्राजापत्य’ नावाचे व्रत करावे.

काही वर्षांनी विदेशात ‘ग्रहणकाळात भोजन केल्याने शरिरावर होणारे अनिष्ट परिणाम’ यासंबंधी ‘शोध’ प्रसिद्ध होतील. विज्ञानवादी (?) तेव्हा ग्रहणकाळात उपवास करतील.

– वैद्य मेघराज माधव पराडकर, सनातन आश्रम, रामनाथी, गोवा. (२.११.२०२२)