‘हर घर तिरंगा’ मोहिमेच्या पार्श्वभूमीवर काँग्रेसचे गिरीश चोडणकर यांची रा.स्व. संघावर टीका

पणजी, ४ ऑगस्ट (वार्ता.) – काँग्रेस देशाला स्वातंत्र्य मिळवून देण्यासाठी लढला आहे; मात्र राष्ट्रीय स्वयंसेवक संघाने स्वातंत्र्यलढ्याच्या काळात ब्रिटिशांना सहकार्य केले, असा आरोप गोवा प्रदेश काँग्रेस समितीचे माजी अध्यक्ष गिरीश चोडणकर यांनी केला. (संघाने स्वातंत्र्यलढ्याच्या काळात ब्रिटिशांना सहकार्य केल्याचा एकतरी पुरावा चोडणकर यांच्याकडे आहे का ? दुसर्यावर टीका करून स्वतः मोठे होता येत नाही ! – संपादक)
(सौजन्य : Goanvarta Live)
गिरीश चोडणकर पुढे म्हणाले, ‘‘भारतीय तिरंग्याला काँग्रेसच्या नेत्यांच्या बलीदानाचे रक्त लागलेले आहे. (बलीदान दिले ते उधमसिंह, भगतसिंह, चंद्रशेखर आझाद, राजगुरु यांसारख्या जहाल क्रांतीकारकांनी ! किती काँग्रेसवाले फासावर चढले ? – संपादक) संघाने तिरंग्याला योग्य सन्मान आणि महत्त्व देण्यास नकार दिलेला आहे. संघाने तिरंगा त्यांच्या नागपूर येथील मुख्यालयावर कित्येक वर्षे फडकावला नव्हता; मात्र मुख्यालयावर वर्ष १९९१ ते २००१ या कालावधीत तिरंगा फडकावण्यात आला. केंद्राच्या‘हर घर तिरंगा’ ही मोहीम चांगली आहे. संघ आणि भाजप यांना अखेर तिरंग्याचे महत्त्व लक्षात आले आहे.’’
संपादकीय भूमिका
|
(म्हणे) ‘संघवाले हिंदू नाहीत, तर केवळ हिंदुत्ववादी आहेत !’ – Yathindra Siddaramaiah
Delhi-NCR : देहली-एन्.सी.आर्.मध्ये मोठ्या आक्रमणाचा कट उधळला
Petrol Bombs At RSS : रांची (झारखंड) येथील रा.स्व. संघाच्या कार्यालयावर अज्ञातांनी फेकले पेट्रोल बाँब !
BJP MLA C.T. Ravi – संघ ही व्यक्तीला राष्ट्रभक्ती शिकवणारी संस्था : नोंदणीची आवश्यकता नाही !
श्री तुळजाभवानी (नवीन) बसस्थानकातील विविध समस्यांमुळे प्रवाशांची गैरसोय !
Mathura Krishna Janmasthan Donation : मथुरेतील श्रीकृष्ण जन्मस्थानाला मिळणार्या देणगीची चौकशी व्हावी ! – हिंदुत्वनिष्ठ दिनेश फलाहारी