भगवान श्रीकृष्ण आणि परात्पर गुरु डॉ. आठवले यांच्या कार्यातील साम्याविषयी ‘एस्.एस्.आर्.एफ.’चे पू. देयान ग्लेश्चिच यांना सूक्ष्मातून मिळालेले ज्ञान !

परात्पर गुरु डॉ. आठवले

१. भक्तांच्या समवेत रहाणे

श्रीविष्णूचा पूर्णावतार भगवान श्रीकृष्ण जेव्हा पृथ्वीवर अवतरला, तेव्हा गोकुळात असतांना तो त्याच्या भक्तांच्या, म्हणजे गोप-गोपींच्या समवेत रहायचा. ‘गोप-गोपींना एकत्र रहाता यावे आणि त्यांना साधना करता यावी’, यासाठी श्रीकृष्णाने त्यांना पृथ्वीवर जन्म दिला. त्याचप्रमाणे श्रीविष्णुस्वरूप परात्पर गुरु डॉ. आठवले यांनी ठिकठिकाणी आश्रम आणि सेवाकेंद्र यांची निर्मिती केली आहे. त्यांनी सर्व साधकांना आश्रमात राहून सेवा आणि साधना करण्याची संधी उपलब्ध करून दिली आहे.

पू. देयान ग्लेश्‍चिच

२. भक्तांचे स्थुलातील आणि सूक्ष्मातील आक्रमणांपासून रक्षण करणे

गोकुळावरही स्थुलातून आणि सूक्ष्मातून राक्षसांची सतत आक्रमणे होत असत. त्या वेळी श्रीकृष्ण सर्व गोप-गोपींचे रक्षण करत असे. आताही समाजकंटक स्थुलातून आणि वाईट शक्ती सूक्ष्मातून साधकांवर सतत आक्रमणे करत असतात अन् या आक्रमणांपासून परात्पर गुरुदेव सर्व साधकांचे रक्षण करत आहेत.

३. भक्तांचे आपत्काळात रक्षण करणे

गोकुळात जेव्हा मुसळधार पाऊस पडून पूर आला होता, तेव्हा श्रीकृष्णाने गोवर्धन पर्वत उचलून गोप-गोपींचे रक्षण केले होते. त्याचप्रमाणे जेव्हा पृथ्वीवर आपत्काळ येईल, तेव्हा परात्पर गुरु डॉक्टर सर्व साधकांना विविध आश्रम आणि सेवाकेंद्र यांमध्ये आश्रय देऊन त्यांचे रक्षण करतील अन् त्यांचे हे कार्य गोवर्धन पर्वत उचलल्याप्रमाणेच असेल.

– श्री सरस्वतीदेवी ((पू.) देयान ग्लेश्चिच (युरोप) यांच्या माध्यमातून) (२१.७.२०२१)

  • सूक्ष्म : व्यक्तीचे स्थूल म्हणजे प्रत्यक्ष दिसणारे अवयव नाक, कान, डोळे, जीभ आणि त्वचा ही पंचज्ञानेंद्रिये आहेत. ही पंचज्ञानेंद्रिये, मन आणि बुद्धी यांच्या पलीकडील म्हणजे  ‘सूक्ष्म’. साधनेत प्रगती केलेल्या काही व्यक्तींना या ‘सूक्ष्म’ संवेदना जाणवतात. या ‘सूक्ष्मा’च्या ज्ञानाविषयी विविध धर्मग्रंथांत उल्लेख आहेत.
  • वाईट शक्ती : वातावरणात चांगल्या आणि वाईट शक्ती कार्यरत असतात. चांगल्या शक्ती चांगल्या कार्यासाठी मानवाला साहाय्य करतात, तर वाईट शक्ती त्याला त्रास देतात. पूर्वीच्या काळी ऋषिमुनींच्या यज्ञांत राक्षसांनी विघ्ने आणल्याच्या अनेक कथा वेद-पुराणांत आहेत. ‘अथर्ववेदात अनेक ठिकाणी वाईट शक्ती, उदा. असुर, राक्षस, पिशाच तसेच करणी, भानामती यांचा प्रतिबंध करण्यासाठी मंत्र दिले आहेत. वाईट शक्तींच्या त्रासांच्या निवारणार्थ विविध आध्यात्मिक उपाय वेदादी धर्मग्रंथांत सांगितले आहेत.
  • येथे प्रसिद्ध करण्यात आलेल्या अनुभूती या ‘भाव तेथे देव’ या उक्तीनुसार साधकांच्या वैयक्तिक अनुभूती आहेत. त्या सरसकट सर्वांनाच येतील असे नाही. – संपादक