पोलीस आणि गोरक्षक यांच्यावर आक्रमण करणार्‍या धर्मांधांना अटक करून अवैध पशूवधगृह बंद करण्यात यावे !

धाराशिव येथील विविध हिंदुत्वनिष्ठ संघटनांचे पोलीस आणि प्रशासन यांना निवेदन

धर्मांधांनी वारंवार पोलीस आणि गोरक्षक यांवर आक्रमणे करणे सरकारसाठी लज्जास्पद ! – संपादक 

धाराशिव येथील जिल्हाधिकारी कार्यालयात निवेदन देतांना हिंदुत्वनिष्ठ

धाराशिव, ८ फेब्रुवारी (वार्ता.) – येथील अवैध पशूवधगृहावर कारवाईसाठी गेलेले गोरक्षक आणि पोलीस यांच्यावर धर्मांधांनी केलेल्या आक्रमणाच्या प्रकरणी संबंधित अवैध पशूवधगृह बंद करून आक्रमकांना तात्काळ अटक करावी, अन्यथा तीव्र आंदोलन छेडण्यात येईल, या मागण्यांचे निवेदन जिल्ह्यातील विश्व हिंदू परिषद, हिंदु राष्ट्र सेना, श्री शिवप्रतिष्ठान हिंदुस्थान यांच्यासह विविध हिंदुत्वनिष्ठ संघटनांच्या वतीने जिल्हाधिकारी आणि पोलीस अधीक्षक यांना देण्यात आले. (अशी मागणी हिंदुत्वनिष्ठांना का करावी लागते ? पोलिसांनी ही कारवाई स्वत:हूनच करणे अपेक्षित आहे. – संपादक)

येथील खिरमणीमळा भागामध्ये ५ फेब्रुवारीच्या रात्री अवैध पशूवधगृहावर कारवाई करण्यासाठी गेलेले मानद प्राणी कल्याण अधिकारी श्री. धन्यकुमार पटवा आणि त्यांचे सहकारी अन् पोलीस यांच्यावर कसायांनी आक्रमण केले होते. या आक्रमणात धन्यकुमार पटवा यांच्यासह त्यांचे सहकारी आणि काही पोलीस कर्मचारी गंभीर घायाळ झाले आहेत. त्यामुळे ‘धन्यकुमार पटवा यांच्या जीवितास धोका असल्याने त्यांना शासकीय सुरक्षा पुरवण्यात यावी’, अशीही मागणी या वेळी हिंदूंनी केली आहे.