सर्व आगारांतून धावल्या २१५ बस

सातारा, १५ डिसेंबर (वार्ता.) – एस्.टी. कर्मचारी विलीनीकरणाच्या मागणीवर ठाम आहेत. दीड मासापासून या मागणीसाठी आंदोलन चालू आहे. काही आगारातून बससेवा चालू झाली असली, तरी काही कर्मचार्यांवर निलंबनाची कारवाई करण्यात आली होती, तसेच काही कामगारांच्या अनुपस्थितीमुळे नियोजनामध्ये अडचणी येत होत्या. १३ डिसेंबरपर्यंत जे कर्मचारी कामावर उपस्थित रहातील, त्यांचे निलंबन मागे घेण्याची घोषणा परिवहनमंत्री अनिल परब यांनी केली होती. त्याप्रमाणे सातारा विभागातील ११ कर्मचारी कामावर उपस्थित झाल्यामुळे त्यांचे निलंबन मागे घेण्यात आले आहे. त्यामुळे १३ डिसेंबर या दिवशी जिल्ह्यातील विविध मार्गांवर २१५ बस धावल्या. यामध्ये ५६ खासगी शिवशाही, तर १५९ साध्या बसचा समावेश आहे.
सातारा विभागात १३ डिसेंबरपर्यंत १ सहस्र २० कर्मचारी कामावर रुजू झाले आहेत. विभागातील ११ आगारांतून बस सेवा पूर्ववत् होत असून बसस्थानकातील गर्दी हळूहळू वाढू लागली आहे.
ह.भ.प. विनायक केशव कुलकर्णी यांना शिर्डी येथे ‘महाराष्ट्र गुणगौरव समाजरत्न’ पुरस्कार प्रदान !
दोडामार्ग येथे सेवानिवृत्त वृद्ध व्यक्तीची २ लाख रुपयांची ऑनलाईन फसवणूक
तुर्भे विभागात विद्युत् पुरवठा वारंवार खंडित; जनता त्रस्त !
स्थानांतरासाठी शिक्षकाकडून २५ सहस्र रुपयांची लाच घेतांना अधिकारी डी.सी. कुंभार यांना अटक
अक्कलकोट येथे शाळकरी मुलीवर अत्याचार करणार्या अरबाजला अटक !
बेडग (सांगली) येथे सिलिंडरचा स्फोट